आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जेवणातील पदार्थांमध्ये मीठ चवीपुरते असावे. मीठ म्हणजेच सोडियमची शरीराला किती गरज असते हे माहित असणे आवश्यक आहे. याची योग्य पातळी राखणे अवघड असते. दिवसभरात साधारण 1 टीस्पून मीठ शरीराला आवश्यक असते. शरीरातल्या अत्यंत महत्त्वाच्या क्रियांमध्ये याची गरज असते. मीठाबाबत ही आवश्यक माहिती आपण जाणून घेवूयात.
हे आहेत दुष्परिणाम
1 मुलांच्यात ओबेसिटीचे प्रमाण वाढते.
2 जास्त खारट पदार्थ खाल्ल्याने भूक वाढत जाते.
3 हृदय, किडनीवर परिणाम होतो.
4 ब्लड प्रेशर वाढते.
5 अंगावर – हातापायावर डोळ्याखाली सूज येणे.
6 सतत डोके दुखते.
7 हाडे ठिसूळ होतात.
8 हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
हे पदार्थ टाळा
ब्रेड, बिस्कीट, चीझ, टोमॅटो सॉस, चिली, सोया सॉस, पापड, लोणची, रेडिमेड ,पॅकेज्ड पदार्थ, खारवलेले मासे, टिनमध्ये पॅक केलेले पदार्थ, फ्रुट ज्युसेस, सूप्स, नूडल्स.