आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तासनतास एकाच जागेवर बसून काम केल्याने लठ्ठपणा वाढण्याचे प्रमाण खुप वाढले आहे. यामुळे रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह असे आजार होण्याचे प्रमाणही जास्त आहे. यासाठी योग्यप्रकारे काळजी घेणे खुप गरजेचे आहे. काम करण्याच्या वेळेत बदल करता येत नसला तरी काही गोष्टींचे पालन करून ही समस्या दूर होऊ शकते.
हे आहेत धोके
१) मांसपेशी कठोर होतात. मान आणि पायांमध्ये वेदना होतात. पाठ किंवा कंबरदुखीचा त्रास होतो.
२) शरीरात चरबी जमा होऊ लागते. पोटाची चरबी वाढते. रक्त प्रवाह पूर्णपणे होत नसल्यामुळे रक्ताच्या गाठी होतात. स्ट्रोकची शक्यता वाढते.
३) पल्मोनरी एम्बोलिज्म म्हणजे फुप्फुसात रक्ताच्या गाठी होऊ लागतात.
४) हृदयासंबंधी समस्या आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
अशी घ्या काळजी
१) पौष्टिक आहार घ्या.
२) पायांना थोड्या थोड्या वेळाने हलवत राहा.
३) मध्ये मध्ये उठून चालावे. काही काम उभे राहून करा.
४) शरीराच्या आकाराकडे नेहमी लक्ष द्या.
५) कामादरम्यान खांदे आणि मानेला फिरवा.