आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एकट्यानेच जेवण करणे अथवा इतरांसोबत जेवण करण्याने शरीरावर आणि मनावर काही फरक पडतो का ? तर या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. कारण या प्रश्नामध्ये विज्ञानही दडलेले आहे. काही कारणामुळे अनेक व्यक्तींना एकट्यानेच जेवावे लागते. तर काही लोकांना एकट्यानेच जेवण करण्याची सवय असते. ही सवय आरोग्यासाठी घातक असल्याचे दक्षिण कोरियातील डॉन्गक यनिव्हर्सिटितील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या प्रयोगात या शास्त्रज्ञांनी सुमोर ८ हजार व्यक्तींचा दीर्घ अभ्यास केला.
हे आहेत धोके
१. एकट्याने जेवण करण्याची सवय असलेल्यांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढतात.
२. जंक फूड खाण्याचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणावर वाढते.
३. मानसिक समस्येचाही त्यांना सामना करावा लागतो.
४. एकट्यानेच जेवण करणाऱ्या सुमारे ४५ टक्के लोकांना स्थूलपणाची समस्या जाणवते.
५. चौसष्ट टक्के लोकांमध्ये पचनाच्या तक्रारी आढळून येतात.
हे लक्षात ठेवा
* जेवताना सोबत कोणीतरी जोडीदार घेऊन त्यांच्या सोबतीने जेवण करा.
* सोबतीने जेवल्याने आरोग्याच्या समस्या दूर होतील.