आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दिवसभरात भरपूर पाणी प्यावे, यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जाऊन शरीर निरोगी होते, असे सांगितले जाते. मात्र, दिवसभरात किती पाणी प्यावे, याबाबत एकवाक्यता दिसून येत नाही. याबाबत आयुर्वेदात काय सांगितले आहे, याची माहिती आपण घेणार आहोत. आयुर्वेदात पाणी पिण्याची योग्य वेळ आणि प्रमाण सांगितले आहे. चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या प्रमाणात प्यायले तर नुकसान होऊ शकते. याविषयी माहिती घेवूयात.
हे नेहमी लक्षात ठेवा
* २ ग्लास पाणी सकाळी उठल्याबरोबर प्यावे. यामुळे शरीर डिटॉक्स होईल, किडनी निरोगी राहील.
* १ ग्लास पाणी व्यायाम करण्याच्या १० मिनिटांपूर्वी प्यावे. यामुळे ऊर्जेचे प्रमाण टिकून राहील.
* २ ग्लास पाणी व्यायाम करण्याच्या २० मिनिटांनंतर प्यावे. यामुळे शरीरात पाणी टिकून राहील.
* १ ग्लास पाणी चहा किंवा कॉफी पिण्याअगोदर प्यावे. यामुळे अॅसिडिटी होणार नाही.
* १ ग्लास पाणी अंघोळीपूर्वी प्यावे. यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहील.
* १ ग्लास पाणी जेवणाच्या ३० मिनिटे अगोदर प्यावे. यामुळे पचनशक्ती चांगली होईल.
* २ घोट पाणी जेवण करताना प्यावे. यामुळे जेवण चांगल्याप्रकारे पचेल.
* २ ग्लास पाणी संध्याकाळच्या नाष्ट्याअगोदर प्यावे. यामुळे भरपूर न्याहारी होणार नाही.
* १ ग्लास पाणी थकवा आणि तणावाच्या वेळी प्यावे. यामुळे मन शांत होईल.
* १ ग्लास पाणी झोपण्याअगोदर प्यावे. यामुळे झटका आणि हृदयविकार टाळता येईल.