आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गरोदरपणानंतर मातेने आरोग्याची जास्त काळजी घेतली पाहिजे. यासाठी डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता नाही. घरगुती पदार्थांचा वापर करूनही निरोगी राहता येते. यासाठी जिरे खुप महत्वाचे आहे. यात अनेक औषधी गुणधर्म असल्याने याचे पाणी प्यायल्याने फायदा होतो.
हे आहेत फायदे
१) नियमित जिरे पाणी प्यायल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होऊ शकते.
२) रक्तदाब आणि हृदयाच्या आजारांपासूनही बचाव होतो.
३) याचे नियमित सेवन केल्याने बाळासाठी पुरेसे दूध येते.
४) रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होते.