आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कारले चवीला कडू असले तरी शरीरासाठी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कारल्याची भाजी नियमित सेवन केल्यास रक्त साफ होते. मधुमेह, दमा, पोटदुखी या आजारांत कारले रामबाण उपाय आहे.
हे आहेत फायदे
१. यातील केरेटिन रसायनामुळे रक्तातील शुगर लेव्हल नियंत्रित राहते.
२. कारल्यात तांबे, व्हिटॅमिन बी, अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडसारखी पोषक तत्व असतात. यामुळे रक्त स्वच्छ होते.
३. किडनी सुद्धा निरोगी राहते.
४. कफचा त्रास कमी होतो.
५. दम्याच्या रूग्णांना आराम मिळतो.
६. गॅस, अपचनाचा त्रास दूर होतो.
७. लखवा गेलेल्या रुग्णांनी कच्चे कारले खावे.
८. उलटी तसेच पोटात दुखत कारल्याच्या रसात पाणी आणि काळे मिठ घालून प्यायल्यास आराम मिळतो.
९. कारल्याचा रस घेतल्यास काविळीत आराम मिळतो.
१०. कारल्याच्या रसाचा लेप डोक्यावर लावल्यास डोकेदुखी दूर होते.
११. तोंडात फोड आल्यास कारल्याचा रसाने गुळणी करावी.