आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जे अन्नपदार्थ आपण खातो, त्यांच्याबरोबर जगा. त्या पदार्थाची चव, रंग, स्पर्श, आकार या सगळ्या गोष्टी मनापासून अनुभवा. हा अनुभव केवळ पोषणच करणार नाही, तर एक अपूर्व असा आनंद देऊन जातो, असे मत संशोधकांनी मांडले आहे. अन्नदपदार्थांचा योग्यपद्धतीने अस्वाद घेतला तर तुमचे आयुष्य सुखी आणि ताणतणावापासून मुक्त राहू शकते, असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
हे आहेत फायदे
१. जे लोक योग्य पद्धतीने अन्नपदार्थांचा आस्वाद घेतात, त्यांचे आयुष्य तुलनेने सुखी असते
२. ताणतणाव दूर राहतो.
३. अशापद्धतीने पदार्थांचा अस्वाद घेणारे लोक उत्साही, तत्पर आणि कोणत्याही आव्हानांना सहजपणे सामोरे जाणारे असतात.