आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरासाठी कलिंगडाचे सेवन लाभदायक आहे. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते. अनेकांना काहीही खाल्ले की पाणी पिण्याची सवय असते. परंतु, कलिंगड खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. कारण, यात अगोदरच भरपूर पाणी असते. त्यामुळे आणखी पाणी पिणे योग्य नाही. कलिंगड खाल्ल्यानंतर पाणी पिणे ही सवय आरोग्यासाठी घातक असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
ही आहेत कारणे
१) अन्न खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिल्यास पोटात पाण्याचे अन्नासोबत मिश्रण होते. यामुळे अन्न चांगल्या प्रकारे पचन होत नाही.
२) फळे खाल्ल्यानंतर जास्त पाणी पिल्यास जठरासंबंधी समस्या जाणवू शकतात.
३) पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या फळांवर पाणी पिल्यास कॉलरा होऊ शकतो. मात्र फळ इंफेक्टेड असेल, तरच असे होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
४) फळांवर जास्त पाणी पिल्यावर पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार झाल्याने अन्न पचन होत नाही.
५) किडनीचे रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि हदयाचा आजार असलेल्यांनी हे फळ खाणे टाळावे.
* यात भरपूर पाणी असल्याने त्यावर आणखी पाणी प्यायल्यास पोटाच्या तक्रारी वाढू शकतात.