आरोग्यनामा ऑनलाईन टीम – स्मरणशक्ती चांगली असेल तरच तुम्ही स्पर्धेच्या या युगात टिकू शकता. परंतु, धावपळीच्या जीवनशैलीमुळे तसेच काही चुकांमुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो. या आजारास अल्झायमर असे म्हणतात. मेंदूशी संबंधीत हा आजार झाल्यास विस्मरण, स्मृती नष्ट होणे, असे परिणाम दिसून येतात.
ही आहेत कारणे
१) आहारातून शरीराला पुरेसे अन्नघटक न मिळणे.
२) आहारातून पुरेसे ओमेगा थ्री अँसिड न मिळणे.
हे लक्षात ठेवा
* लाइफस्टाइल बदला. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या.
* ओमेगा थ्री अँसिड मिळवण्यासाठी अक्रोड, मासे, अंबाडीच्या बिया, सोयाबिन, पालकचे सेवन करा.
* ओमेगा थ्री अँसिड आणि अल्झायमर यांच्यात खूप जवळचा संबंध.
* ओमेगा थ्री अँसिड मेंदूतील स्मृती आणि शिक्षणाच्या संदर्भातील केंद्रांना रक्तपुरवठा वाढवते. यामुळे ही केंद्रे कार्यक्षम राहतात. यामुळे अल्झायमरसारखे विकार होणार नाहीत.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)