आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कॉफी प्यायल्याने ताजेतवाने वाटते, थकवा दूर होतो, काम करताना झोप येत नाही, आळस दूर होतो, हे फायदे आहेत. पण, कॉफीचे सतत सेवन करणे हे शरीरासाठी घातक आहे. कॉफीचे अतिसेवन केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यातील कॅफिन शरीरासाठी अपायकारक असते.
हे आहेत दुष्परिणाम
१. रात्री कॉफीचे सेवन केल्यास निद्रानाश होतो. झोप कमी येत असेल त्यांनी तर कॉफीचे सेवन कधीच करू नये.
२. कॉफी जास्त वेळा प्यायल्यास अॅसिडीटी देखील वाढते.
३. कॉफीमुळे अनेकवेळा भूक देखील लागत नाही.
* हे लक्षात ठेवा
दिवसातून सहा-सात कप कॉफी पिण्याची सवय त्रासदायक ठरू शकते. दिवसातून एक ते दोन कप कॉफी प्यायली तर काहीही फरक पडत नाही. मात्र अतिरेक केल्यास त्रास होऊ शकतो.