आरोग्यनामा ऑनलाईन टीम – प्रगतीपथावर राहण्यासाठी मी सतत धावपळ करतो, असे म्हणणारे अनेकजण आढळतात. परंतु, धावपळीचे जीवन म्हणजे प्रगती नव्हे. अशा धावपळीमुळे असंख्य आजार आपल्या मागे लागतात. जीवनाचा आनंद घेण्याचे आपण विसरूनच जातो. शिवाय अशा जीवनशैलीमुळे तरूणवर्ग सुद्धा विविध आजारांनी गुरफटलेला दिसू लागला आहे. म्हणूनच जगभर टेक इट स्लो ही नवीन जीवनशैली विकसित होत आहे. शांत व्हा, आहे ते जगा, पळू नका, हेच ही जीवनशैली सांगते.
या ५ गोष्टी लक्षात ठेवा
१) आंघोळ अनुभवा
प्रत्येकजण नियमित आंघोळ करतो. परंतु, हे आंघोळ करणे नव्हे, आंघोळ उरकणेच जास्त असते. आंघोळ करताना अंगावर पडलेल्या पाण्याच्या पहिल्या थेंबाचा स्पर्श जाणवल्यास मेंदूतील शांततेची केंद्र जागी होतात. यामुळे अटेन्शन स्पॅन वाढतो. म्हणून आंघोळ उरकू नका, ती अनुभवा. स्वच्छता आणि चैतन्याचा अनुभव घ्या.
२) वेळ नाही
माझ्याकडे कामामुळे वेळच नाही, असे म्हणणे आपल्याकडे स्टेट्स सिम्बॉल होऊन बसले आहे. परंतु, यामुळे तुम्ही स्वत:कडेच कधी दुर्लक्ष करता हेच तुम्हाला समजत नाही. म्हणून किमान घरच्यांना आणि स्वत:ला रोज पुरेसा वेळ द्या.
३) माणसांना भेटा
फोन, सोशल मीडियावरील संवादाचे अभासी जीवन कमी करा, प्रत्यक्ष माणसांना भेटा. यातून जो आनंद मिळतो तो सर्वाधिक आनंददायी आणि आरोग्यदायी असतो. यामुळे शांत आणि प्रसन्न वाटते.
४) भूक लागण्यापूर्वी जेवण करा
माझ्याकडे जेवायलाही वेळ नाही, असेही काहीजण म्हणतात. परंतु, यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य धोक्यात घालत असता. काही वेळात भूक लागणार आहे हे शरीर सांगत असते, अशा वेळी शांत आणि प्रसन्न मनाने जेवण करा.
५) काय खाता
अनेकजण घाईघडबडीत काय खातात ते त्यांनाही कळत नाही. अगदी सकाळी काय खाल्ले हे अनेकांना संध्याकाळी आठवत नाही. म्हणूनच जेवणाकडे, त्याच्या चवीकडे, सुगंधाकडे, रंगाकडे लक्ष द्या. जेवण हे सुद्धा जीवन असून ते खुप महत्वाचे आहे. जे महत्वाचे आहे, ते आपण लक्षात ठेवतो. हे लक्षात असू द्या.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)