आरोग्यनामा ऑनलाईन – सौंदर्य वाढविण्यासाठी ही थेरपी सर्वात चांगला मार्ग आहे. हजारो रूपये खर्च करून जे सौंदर्य मिळत नाही ते या थेरपीने मिळू शकते. यात पैसे खर्च न करता पाण्याच्या मदतीने चेहर्यावर ग्लो येऊ शकतो. वॉटर थेरपीने अनेक आजारही दूर राहतात. वॉटर थेरपीचे कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
कशी करावी
सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्याआधी कमीत कमी अर्धा लीटर पाणी प्या. मात्र त्याचं प्रमाण एकावेळेस 600 मिलीपेक्षा जास्त ठेऊ नका. हे प्रमाण पहिल्या दिवसापासून हळूहळू वाढवा. शुद्ध पाण्याचा वापर करा. पाणी प्यायल्यानंतर 45 मिनिटांनी ब्रश करा, तोंड धुवा. त्यानंतर मात्र आणखी 45 मिनिटांचा अवकाश ठेवा. 45 मिनिटांनी तुम्ही नाश्ता करू शकतात. नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण यानंतर लगेच पाणी पिऊ नका, प्रत्येक वेळी पाणी 2 तासानंतर प्या. हे दररोज करा.
हे आहेत फायदे
1 त्वचेची चम वाढते. त्वचेचे आजार दूर होतात.
2 शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
3 त्वचा हायड्रेटेड राहते.
4 डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार दूर राहतात.
5 संधीवात, ह्दयाचे जलद ठोके, मिर्गी-अपस्मारावी उपयोगी.
6 लठ्ठपणा, दमा, टीबी, मेंदुच्या बाहेरील दाह बरा होतो.
7 किडनी, मुत्राशयाचे आजार, उलट्या थांबतात.
8 जठराची सूज, जुलाब, अपचन, मूळव्याधीवर गुणकारी.
9 मधूमेह-डायबेटीस, बद्धकोष्ठता होत नाही.
10 डोळ्यांचे आजार, गर्भाशयाचे आजार बरे होतात.
11 कॅन्सर, मासिक पाळींचा आजार होत नाही.
12 कान-नाक आणि घशाचा आजार प्रभावी आहे.