आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्या शरीरासाठी पाणी हे अतिशय महत्वाचे आहे. म्हणूनच पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. पाणी किती प्यावे, केव्हा प्यावे आणि कसे प्यावे, यास खुप महत्व आहे. मात्र, जेवावे कसे हे आपल्याकडे शिकवले जाते, पण पाणी कसे प्यावे हे शिकवले जात नाही. चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यामुळे शरीराला अपाय होवू शकतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
हे लक्षात ठेवा
१. बाहेरुन उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नका.
२. उभे राहून, भांड्याला तोंड न लावता वरुन पाणी पिऊ नका.
३. कायम बसूनच पाणी प्या.
४. उभ्याने पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो.
५. बसून पाणी प्यायल्याने मृतपिंडाचे कामही सुरळीत चालते.
६. तहान लागली तरच पाणी प्या. उगाचच पाणी पिऊ नका.
७. पाणी पिताना एकदम घटाघटा पिऊ नका, थोडे थोडे पाणी हळूहळू प्या.
८. घटाघटा पाणी प्यायल्याने मन भरत नाही. तहान भागल्यासारखे वाटत नाही.