आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोबीची भाजी घरोघरी मोठ्याप्रमाणात सेवन केली जाते. परंतु,कोबीसह काही भाज्या अशा असतात, ज्या योग्यपद्धतीने स्वच्छ करून न वापरल्यास जीवघेण्या ठरू शकतात. अशा फळभाज्यांमुळे टॅपवार्म संक्रमण होऊ शकते. कोबी, फ्लॉवर यामध्ये आढळणारी एक अळी डोळांनी दिसत नाही. कारण ही अळी कोबीच्या मधल्या भागात लपलेली असते. ही अळी उच्च तापमानातही जिवंत राहते. पोटात गेल्यानंतर ही आळी मेंदुपर्यंत पोहचल्याने जीवसुद्धा धोक्यात येऊ शकतो. या आजारास Cerebral cysticercosis म्हटले जाते. म्हणून योग्यपद्धतीने स्वच्छ करूनच अशा भाज्या वापरल्या पाहिजेत.
अशा धुवा भाज्या
कोबी, फ्लॉवर या भाज्या साध्यापद्धतीने धुवूनही यातील किडे पुर्णपणे निघत नाहीत. या भाज्या उकळून घेतल्या तरीही हे पुर्णपणे दूर होत नाही. हा धोका टाळण्यासाठी ‘पोटॅशियम परमॅग्नेट’ हा एक उत्तम उपाय आहे. हे थोडेसे घेऊन एका पाण्याने भरलेल्या पातेल्यात मिसळावे. यामध्ये भाजी बुडवून ठेवा. ३ ते ५ मिनिटांनंतर या भाज्या खळखळून धुवून घ्या. हा सर्वात प्रभावी उपाय आहे.
घातक आहे अळी
कोबीतील अळी आरोग्यासाठी खुप घातक असून ती रक्तप्रवाहाच्या माध्यमातून मेंदूमध्ये प्रवेश करते. यास Taeni solium नावानेही ओळखले जाते. कोबी, फूलकोभी, पत्ता कोबी, ब्रोकली यांसारख्या फळभाज्यांमध्ये ही आढळते. ही अळी एका रिबन प्रमाणे असते आणि आपल्या आतड्यांंना चिटकते. आतड्यांमध्येच अळी अंडी देते. ही अंडी पुर्णपणे तयार झाल्यानंतर रक्तप्रवाहाच्या माध्यमातून मेंदूपर्यंत जाते. नंतर लिव्हर आणि आतड्यांसारख्या अवयावंमध्ये ती पसरते. ही अळी जेव्हा मेंदूपर्यंत पोहचल्यावर डोकेदुखी, अर्धांगवायू किंवा फिट येणे अशी समस्या होते. Cerebral cysticercosis हा आजार परजीवी संसर्ग म्हणून ओळखला जातो. हा तीन टप्प्यात होऊ शकतो. या आजारात मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते.