आरोग्यनामा ऑनलाइन टीम – भात हे आपल्या जेवणातील मुख्य अन्न आहे. आपल्याकडे काही सण असेल तर आपण आमटी भात, वरण भात खूप आवडीने खातो. आणि काही काही लोकांचं तर भात खाल्ल्याशिवाय जेवणच पूर्ण होत नाही. परंतु , काही लोकांना असं वाटत की, भात खाल्याने खूप वजन वाढत त्यामुळे अनेक जण भाताचा आपल्या आहारात समावेश करत नाहीत. पण भाताचे आपल्या शरीरासाठी खूप फायदे आहेत. त्यामुळे आपण आपल्या आहारात भाताचा अवश्य समावेश करायला हवा.
भात खाल्याचे फायदे पुढीलप्रमाणे
१) आपल्याला कधी कधी खूप भूक लागते. त्यावेळी आपण जर थोडा भात खाल्ला तर आपल्याला तर लगेच पोट भरते आणि काम करायला ही ऊर्जा येते भात हा आपल्या शरीरासाठी ऊर्जा देण्याचे काम करतो. त्यामुळे भात हा आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे.
२) भातामध्ये खूप प्रमाणात मिनरल्स, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात. भातामध्ये व्हिटॅमिन डी असते. जे तुमच्या शरीराला पोषण देत असते. त्यामुळे रोज भात खा.
३) भातामधील अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज अनेक आजारांसाठी गुणकारी आहे. ह्रदयाशी निगडीत आजारांना भात दूर ठेवू शकतो. याशिवाय अल्झायमर नावाच्या आजारावरही भात गुणकारी आहे.
४) डाएबिटीझ असलेल्यांना भात खाऊ नका असे सांगितले जाते. त्यामुळे अशा व्यक्ती भात खाणे टाळतात. रक्तामध्ये ग्लुकोझचे प्रमाण कमी करण्याचे काम भात करते. जर तुम्हाला पांढऱ्या भाताची भीती असेल तर तुम्ही ब्राऊन राईस खाऊ शकता.
५) जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही भात रोज खायला हवा. भातामध्ये असलेले फायबर तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. भात हा तुमचा उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवतो.