आरोग्यानामा ऑनलाईन टीम : जर तुमचं वय चाळीसपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला आता सावध राहणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरावर अनेक घातक आजारांचा प्रहार होऊ शकतो. या वयात रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. वारंवार आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. चाळीशी पार केल्यानंतर तुम्ही तुमच्या हाडांची विशेष काळजी घ्यायला हवी. कारण या वयात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं कमजोर होतात.
डॉक्टरांचं म्हणणं आहे की, चाळीशीनंतर महिलांच्या हाडांमध्ये त्रास जाणवायला लागतो. हेच कारण आहे की, पुरुषांपेक्षा महिलांना संधीवात होण्याची जास्त शक्यता असते. या वयात महिलांना हाता-पायात सूज, हाडे आणि कंबरदुखी होणं सामान्य बाब आहे. या वयात महिलांनी कॅल्शियमयुक्त पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे.
चाळीशीनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांना काही आजार होण्याची जास्त शक्यता असते. यात स्ट्रोक, डायबिटीज आणि हृदयाचे आजार यांचा समावेश आहे. त्यामुळे महिलांनी आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. महिलांना या वयात योनीत संक्रमण होण्याचीही समस्या उद्भवते. हेच वय आहे जेव्हा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.
Visit : arogyanama.com