आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नैसर्गिक प्रसुतीचा कालावधी हा ९ महिन्यांचा असल्याचे आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहोत. परंतु, हा कालावधी ९ महिन्यांचा नसून जास्त असतो. हा कालावधी नक्की किती महिन्यांचा असतो, हे आपण जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारे आरोग्याबाबत सुद्धा अनेक गैरसमज वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत, यापैकी काही गैरसमज आज आपण दूर करून सत्य जाणून घेणार आहोत.
गैरसमज आणि सत्य
१) प्रो-बायोटीकने सर्दीचा धोका टळतो
* यामुळे सर्दी कायमची जात नाही. प्रो-बायोटीक्समुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे सर्दी होण्याची शक्यता कमी होते.
२) मासिक पाळीचुकली म्हणजे गर्भधारणा झाली
* गर्भधारणा झाल्याने मासिक पाळी येत नाही, हा गैरसमज आहे. मात्र गरोदर राहिल्यावरही मासिक पाळी येऊ शकते किंवा मासिक पाळी येऊन गेल्यावरही गर्भधारणा होऊ शकते.
३) चॉकलेटमुळे पुरळ उठतात
* चॉकलेट किंवा तळलेल्या पदार्थांमुळे पुरळ उठत नसल्याचे त्वचा अभ्यासक सांगतात.
४) गुडघ्यांवरील आघाताने होतो संधीवात
* व्यायामाचा अभाव, आहारातील स्थित्यंतरे आदी अनेक कारणामुळे संधीवात होतो. तरुणपणात गुडघ्यांना दुखापत झाली की म्हातारपणात संधीवात होतो हे पुर्णपणे खोटे आहे.
५) झोपल्याने पाठदुखी कमी होते
* पाठदुखी कमी करण्याची बेड रेस्ट घेतला जातो. मात्र नियमित कामे करूनही पाठदुखी कमी करता येते. त्यासाठी सतत झोपून राहण्याची आवश्यकता नसते.
६) अपरात्री जेवल्याने वजन वाढते
* हा गैरसमज आहे. दिवसातून आपण किती जेवतो, त्यामुळे किती कॅलरीज मिळतात यावर वजन वाढणे आणि कमी होणे अवलंबून असते. क्षमतेपेक्षा अधिक खाऊ नये.
७) गरोदरपणाचा काळ ९ महिन्यांचा असतो
* नैसर्गिक प्रसुतीसाठी ९ महिने वाट पाहिली जाते. मात्र हा कालावधी ९ महिन्यांचा नसून त्यापेक्षा जास्त म्हणजे ४० आठवड्यांचा असतो. गरोदर राहण्याच्या शेवटच्या मासिक पाळीपासून गरोदरपणाचे दिवस मोजले जातात.