आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Monsoon Diet Tips | पावसाळ्यात बहुतांश आजार खाण्या-पिण्याशी संबंधित असतात. अशावेळी प्रत्येक व्यक्तीने खाण्या-पिण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या हंगामात खाण्याच्या कोण-कोणत्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे ते जाणून घेवूयात…
1. भाज्या :
पावसाळ्यात पालक, मेथी, चंदन बटवा, वांगी, कोबी, फ्लॉवर सारख्या भाज्या टाळल्या पाहिजेत. या हंगामात किड्यांची फर्टिलिटी वाढते. विशेषता पालेभाज्यांमध्ये ते खुप वेगाने वाढतात, यासाठी पालेभाज्या खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते.
2. मासे आणि इतर सी-फूड :
पावसाळा बहुतांश माशांचा प्रजननाचा काळ असतो. यासाठी मासे आणि सी-फूड खाल्ल्याने फूड पॉयजनिंगचा धोका वाढतो.
3. मशरूम :
या हंगामात मशरूम खावू नये. कारण ते जमीनीत उगवत असल्याने अनेक प्रकारचे बॅक्टेरियल इन्फेकशन होण्याचा धोका वाढतो.
4. तळलेले-भाजलेले आणि स्ट्रीट फूड :
तळलेले-भाजलेले आणि स्ट्रीट फूड या हंगामात खाल्ल्याने पित्त वाढते. आजार वाढतात.
5. कापून ठेवलेली फळे :
खुपवेळ कापून ठेवलेली फळे आणि भाज्या सेवन करू नका. यात जंतूसंसर्ग होण्याचा धोका असतो.
6. मांसाहार
पावसाळ्यात पचनक्रिया कमजोर असल्याने मांसाहार शक्यतो टाळा.
Web Titel :- monsoon diet tips avoid eating these things during rainy season it can cause several serious diseases see latest health care tips marathi
clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय
Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या