आरोग्यनाम ऑनलाइन टीम –
वजन वाढणे अथवा कमी होणे हे बहुतांशी कॅलरीच्या गणितावर अवलंबून आहे. जितक्या कॅलरी शरीर घेते, त्यापेक्षा जास्त खर्च केल्या तर वजन कमी होते. या उलट झाले तर वजन वाढू लागते. परंतु, सर्वांच्याच बाबतीत हे लागू पडत नाही. शरीर प्रकृती, शरीराची रचना, चयापचय, आहार आणि व्यायाम यावरही खुप काही अवलंबून असते.
हे लक्षात ठेवा
१ पिष्ठमय पदार्थांचं सेवन केल्यास इन्सुलिन रेसिस्टंस, चरबी जास्त प्रमाणात साठते.
२ पिष्ठमय पदार्थ शरीराला ऊर्जा देतात. हे पूर्णत: वज्र्य केल्यास शरीराला थकवा येऊ शकतो.
३ योग्य ते पिष्ठमय पदार्थांचं सेवन केल्यास थकवा न येता वजन कमी करता येतं.
४ प्रक्रिया केलेले तयार पॅकबंद पिष्ठमय पदार्थ हे शरीरासाठी घातक ठरतात.
५ नैसर्गिक रूपात मिळणारे पिष्ठमय पदार्थ जसे बटाटा, बीट, गाजर, रताळी हे चांगले आहे.
६ धान्य वर्गात मोडणारे पिष्ठमय पदार्थ जसे की गहू, ज्वारी, बाजरी, नागली, भात यांचं प्रमाणात, घरगुतीरीत्या बनवून सेवन केल्यास ते वाईट नाहीत.
७ साखर-गूळ दोन्हीही अति घेतल्यास हानिकारक ठरतात.
८ जेवणानंतर गोड खाणे टाळा. यामुळे वजन वाढते.
९ फळे व सुकामेवा कमी कॅलरी असतात.
१० प्रथिनेयुक्त खाण्यामुळे पोट जास्त काळ भरलेले वाटते. मांसाहारी पदार्थांतून उत्तम प्रकारची प्रथिनं मिळतात. शाकाहारी व्यक्तींनी डाळी, उसळी, पनीर, सोयाबीन खावे.
११ आहारात तेल, तूप हे चरबीयुक्त पदार्थ योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे.
१२ तंतुमय व जीवनसत्त्वयुक्त काकडी, कांदा, टोमॅटो, कोबी, फ्लावर, ब्रोकोली, सेलेरी याचा आहारात समावेश करावा.
१३ वेगवेगळ्या परस्परविरोधी डाएटमुळे अनेकजण संभ्रमात पडतात. चांगले डाएट आयुष्यभर नियमित करायला हवे.
१४ योग्य सर्वसमावेशक आहार घेणे आरोग्यासाठी चांगले आहे.