आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तुमच्याकडे सर्वकाही असो अथवा तुटपुंजे असो, जीवन तणावमुक्त आणि आनंदी असणे महत्वाचे आहे. जीवनाचा आनंद घेण्याची कला तुम्हाला अवगत झाली तर हा आनंद तुम्ही सहज मिळवू शकता. यासाठी खूप काही करण्याची गरज नाही. केवळ काही निर्णय घेण्याची आणि रूटीनमध्ये बदल करण्याची गरज आहे. जीवनाचा आनंद हा मन:स्थितीवर अवलंबून असतो. बहुतांश वेळेस कामाचा व्याप असूनही व्यक्ती आनंदी असते, तर काही वेळेस काम आणि तणावात आनंद मिळविता येत नाही. तणावात येणे ही सर्वसाधारण बाब आहे. अतिरिक्त काम आणि तणावामुळे नकारात्मक भावनेकडे माणूस वळतो. यातून मुक्त होण्यासाठी आठ पद्धतींचा अवलंब करावा. या आठ पद्धती कोणत्या त्याची माहिती घेवूयात.कपड्यांमुळे व्यक्तित्व तसेच मन:स्थितीचे आकलन समोरच्या व्यक्तीला होते. मित्र परिवारात किंवा जवळच्या लोकांचे आवडते व्हायचे असल्यास रोजच्यापेक्षा कपड्यांमध्ये तसेच त्या जोडीला वापरत असणारे एक्सेसरीजमध्ये बदल करावा. या एक्सेसरीज खिशाला परवडतील अशाच खरेदी कराव्यात. तसेच आनंदी जीवनासाठी नेहमी मुलांबरोबर खेळले पहिजे. घरी मुले नसतील तर एखाद्या पार्कमध्ये रोज संध्याकाळचा वेळ घालवा.
उद्यानात विविध समाजाची आणि अनेक स्वभावाची मुले येतात. त्यांचे बोलणे, भांडण करणे आणि हसणे हे पाहून देखील काही वेळेस एक प्रकारचा उत्साह संचारतो. आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवतात. या लहान मुलांसोबत तुम्ही खेळलात तर आनंद द्विगुणित होतो. दिवसभराचा थकवा निघून जाण्यास मदत होते.ज्या घरात एखादा पाळीव प्राणी असेल आणि त्या घरातील व्यक्ती त्या प्राण्यासोबत वेळ घालवत असेल तर ते सर्व तणावमुक्त जीवन जगत असतात, यूनिवर्सिटी ऑफ मॅसाच्यूसेट्सच्या २००९ मधील संशोधनातून असे सिद्ध झ्रााले आहे. घरी एखादा डॉगी किंवा मांजराचे पिल्लूदेखील पाळू शकता. ते शक्य नसल्यास रंगीबेरंगी मासे घरात ठेवल्यास खूप चांगला परिणाम होतो. महिलांची दिनचर्या मुले आणि पतीच्या जेवणापासून सुरू होते आणि रात्री त्यांच्याच जेवणाने संपते. या रुटीन लाइफमध्ये परिवर्तन करा. यामुळे महिलांना तणाव येण्याची शक्यता असते. यासाठी एखाद्या फिटनेस सेंटरला जा. यामुळे तुमच्या मन:स्थितीत परिवर्तन होऊन, व्यक्ती उत्साही व आनंदी राहते.
हे सर्व तुम्ही काही दिवसांसाठी आत्मसात करावयाचे आणि नंतर दिनचर्या पुन्हा करावी.आनंदी जीवनासाठी महिलांना योग आणि ध्यान हा सर्वोत्तम मार्ग आहे. योग आणि ध्यान हे वेगवेगळे विषय आहेत. जीवनात आनंदाचा अभाव असल्यास ध्यान करावे. जीवनातील मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानाचा उपयोग होतो. ध्यान लावण्याने शरीर हलके झ्राल्यासारखे वाटते. प्रत्येक व्यक्तीच्या सुप्त इच्छा पूर्ण होतातच असे नाही. पेंटर, डांन्सर, सिंगर, गार्डनिंग असो की स्वयंपाक किंवा आणखी काहीतरी आवडत्या गुणाला आपल्या व्यस्त प्रोफेशनमुळे वेळ देता येत नाही. परंतु काही कारणास्तव हे सर्व शौक बाजूला ठेवणे गरजेचे असते. मात्र, हे शौक जीवनातील असीम आनंद देखील आणू शकतात.नोकरीच्या ठिकाणी महिलांचे मन रमत नसेल तर ताबडतोब जॉब बदलण्याचा विचार करावा. नवीन जागी आपण उत्साह आणि नव्या जोमाने कामाला लागा. तसेच महिलांसाठी शॉपिंग हा विषय अगदी जिव्हाळ्याचा असतो. त्या शॉपिंगमधूनही आनंद लुटत असतात. मन प्रसन्न ठेवण्यासाठी शॉपिंग हा एक उपाय आहे.