अशा खा भाज्या
* फळ किंवा भाजीपाल्यांत ऑलिव्ह ऑइल, नट्स तसेच फॅटचे अन्य सकस स्रोत सामील केल्याने जीवनसत्त्व अ, आणि क चे प्रमाण वाढवता येऊ शकते. या सर्व पोषक तत्त्वांनी दृष्टी, रोगप्रतिकारकशक्ती प्रखर बनते. शिवाय, हृदयास आघात आणि शरीराला ऑस्टियोपोरोसिसपासून सुरक्षित ठेवता येऊ शकते.
* आम्लधारी फळ किंवा भाजीपाला कास्ट-आयर्न पॅनमध्ये शिजवल्याने ऊर्जादायी लोह सत्त्वाचे प्रमाण दोन हजार टक्क्यांनी वाढते. कास्ट-आयर्न पॅनमध्ये स्वयंपाक बनवणे नुकसानकारक नाही. पॅनमधून काही प्रमाणात लोह सत्त्व भाजीत मिसळते. यामुळे चवीत काही फरक पडत नाही.
* सलादमध्ये वनस्पतींची पाने टाकल्याने कर्करोगाशी लढणारी सत्त्व वाढतात. तसेच प्रतिजैविकांची संख्याही दुपटीने वाढते. अद्रकाच्या सेवनानेही प्रतिजैविके वाढतात.
* सफरचंद, गाजरासारखी बहुतांश फळे आणि भाज्या साली काढून खाऊ नयेत. कारण या टरफलातच अधिक पोषक तत्त्वे तसेच फायबर असते. टरफलांसह खाता येतील असे जैविक फळ विकत घ्यायला हरकत नाही. कीटकनाशके आणि घाण स्वच्छ करण्यासाठी फळ किंवा भाज्या स्वच्छ पाण्यानी धुऊन घ्या.
* टोमॅटो तव्यावर गरम करून खाल्ल्यास त्यातील पोषकतत्त्वे हृदयासाठी चांगली ठरतात. यासाठीच अन्य सॉसच्या तुलनेत टोमॅटो सॉस चांगले असते. टोमॅटो कापून त्यास बेकिंग शीटवर ठेवा. नंतर त्यावर थोडेसे ऑलिव्ह ऑइल, मीठ काळे मिरे टाका. यास १५-२० मिनिटांपर्यंत बॉइल होऊ द्या. याचे सेवन आरोग्यासाठी लाभदायी ठरेल.
* फळभाज्या कापताना मोठे तुकडे करावेत. बारीक तुकडे केल्याने यातील न्यूट्रियंटरिच ऑक्सिजन निघून जातो. मोठ्या तुकड्यात जीवनसत्त्व दीर्घकाळ टिकून राहते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. फळ किंवा भाज्या कापल्यानंतर लगेच उपयोगात आणाव्यात. अन्यथा त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होऊ लागतात.
* लसूण आहारात घेतल्याने शरीराला कर्करोगापासून दूर ठेवता येऊ शकते. लसणाची साल काढल्यानंतर त्यास बारीक करून १०-१५ मिनिटे तसेच ठेवा नंतर वापरा. यामुळे लसणातील पोषक तत्त्वे नष्ट होणार नाहीत. अथवा कच्चा लसूण थेट भाजीवरच टाका.