आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पाणी शरीरासाठी खूप आवश्यक आहे. दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास आरोग्य चांगले राहते. शरीराला विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी म्हणजेच शरीरशुद्धीसाठी पाणी खूप आवश्यक असते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. यावरून शरीराला पाण्याची किती आवश्यकता आहे हे समजून येते. परंतु थंड पाण्यासोबतच दररोज १ ते २ ग्लास कोमट पाणी पिणेही गरजेचे आहे. कोमट पाणी अनेक आरोग्य समस्या औषधाप्रमाणे दूर करते.
दररोज कोमट पाणी पिल्याने कोणते फायदे होतात हे आपण जाणून घेणार आहोत. त्वचारोगाने त्रस्त असलेले किंवा तजेलदार त्वचेसाठी विविध कॉस्मॅटिक्स प्रॉडक्ट वापरूनही फरक पडत नसल्यास दररोज एक ग्लास गरम पाणी पिण्यास सुरुवात करावी. यामुळे त्वचारोग दूर होतात. शिवाय, त्वचा तजेलदार होते. कोमट पाण्यामुळे शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात. सकाळी रिकाम्या पोटी व रात्री जेवल्यानंतर कोमट पाणी प्यावे. यामुळे पचनक्रियेशी संबधित आजार होणार नाहीत. पोट साफ राहते. मलबद्धता होत नाही.
शरीरातील एखाद्या भागात गॅसमुळे त्रास होत असेल तर एक ग्लास कोमट पाणी पिल्यास गॅस बाहेर पडतो. सध्या पोटांचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून हे बहुतांश आजार दुषित पाण्यामुळे होतात. आयुर्वेदानुसार पाणीसुद्धा पचावे लागते. त्यामुळे त्यावर अग्निसंस्कार होणे गरजेचे असते. म्हणून प्रत्येक व्यक्तीने उकळून थंड केलेले पाणी प्यावे. उकळल्यामुळे पाणी निर्जंतूक होते आणि हलकेही होते. कोमट पाणी पिणे शरीरासाठी फार उपयोगी असून यामुळे शरीरात शक्तीचा संचार होतो. सर्दीचे रुग्ण, अजीर्णाचे रुग्ण, कफप्रकृती व स्थूल व्यक्तींनी नेहमी कोमट पाणी प्यावे.
दमा, उचकी, घश्यात जळजळ होणे आदी त्रासात तसेच तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्यानंतर कोमट पाणी पिणे लाभदायक आहे. पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यावे. यामुळे मळमळणे, छातीत जळजळ होणे आणि मलावरोध यासारख्या समस्या दूर होतात. कोमट पाणी त्वचेशी संबंधित समस्या दूर करणारे नैसर्गिक औषध आहे. त्वचा तजेलदार ठेवण्यात कोमट पाण्याची महत्त्वाची भूमिका असते.
नियमित एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने भूक वाढते. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एका लिंबाचा रस आणि मीठ टाकून प्यावे. यामुळे पोटातील जडपणा थोड्या वेळातच कमी होतो. लिंबूपाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होते. कोमट पाण्यात लिंबाच्या रसासोबत मध मिसळून प्यायल्यास आरोग चांगले राहते, असे तज्ज्ञ सांगतात. रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यास मूत्ररोग होत नाहीत. हृदयातील जळजळ कमी होते. वाताच्या आजारांमध्ये कोमट पाणी अमृतासमान फायदेशीर आहे.
मासिक पाळीच्या काळात पोट दुखत असेल तर कोमट पाणी प्यायल्यास ताबडतोब आराम मिळतो. कोमट पाण्याचे नियमित सेवन केल्यास रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. कोमट पाण्यामुळे शरीरातील तापमान वाढते. घामाच्या माध्यमातून शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर पडतात आणि रक्ताभिसरण चांगले होते. चरक संहितेनुसार शरीरात ताप असल्यास थंड पाणी न पिता कोमट पाणी प्यावे. तापामध्ये कोमट पाणी जास्त लाभदायक ठरते.