आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तूप खाणे आरोग्यासाठी अयोग्य असल्याचे म्हटले जाते. परंतु, एका अहवालानुसार तुप हे तेलापेक्षा कमी घातक असल्याचे आहे. तेल जास्त गरम केल्यास त्यात विषारी पदार्थ तयार होतात. तुपाचे असे होत नाही. सोयाबीन तेल १६० अंश सेल्सिअस तापमानावर गरम केल्यास अॅक्रिलमाईड हा घातक पदार्थ तयार होतो. तूप गरम केल्यास अॅक्रलमाईड तयार होण्याचे प्रमाण दहा पटींनी कमी असते.
ही आहेत कारणे
१) यात ब्युटिरिक अॅसिड थोडे जास्त असल्याने हे शरीरात उत्तम वंगणाचे काम करते. यामुळे पचन सुधारते.
२) यातील कॉन्जुगेटेट लिनॉलिक अॅसिडमुळे वजन कमी होते.
३) तुपातील दुधाचा अंश निघून गेल्याने ते दीर्घकाळ टिकते. तुपा फ्रिझमध्ये ठेवण्याची आवश्यक नाही. सामान्य तापमानात तूप साठवता येते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)