आरोग्यानामा ऑनलाइन टीम – एखाद्यावेळी पसंतीच्या जेवणावर ताव मारणे ठिक आहे. मात्र, प्रत्येकवेळी जेवणावर ताव मारणे, भूकेपेक्षा जास्त अन्न ग्रहण करणे चांगले नाही. अनेकदा आपले पोट भरले तरी काहीजण बोलण्याच्या नादात अथवा टीव्ही पहात-पहात खातच रहातात. अशा सवयीमुळे शरीरावर परिणाम होतोच, शिवाय स्मरणशक्तीला सुद्धा हानी पोहचू शकते, असे तज्ज्ञ सांगतात.एखादा ज्येष्ठ नागरिक आहारात दररोज २१०० कॅलरींचा समावेश करत असेल तर त्याच्या मेंदूच्या कार्यप्रणालीवर परिणाम होऊ शकतो. कमी कॅलरी असलेला आहार मेंदूची कार्यप्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी लाभकारक ठरतो.
यासंदर्भात अमेरिकन संशोधकांनी एक संशोधन केले. या संशोधनासाठी ७० ते ८९ वयोगटातील १२०० ज्येष्ठ नागरिकांचा संशोधकांनी अभ्यास केला. या ज्येष्ठ नागरिकांना डिमेन्शिया म्हणजेच कमकुवत स्मरणशक्ती नव्हता. या प्रयोगात त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही लक्ष ठेवण्यात आले होते. त्यांची स्मरणशक्ती चाचणी घेण्यात आली. या प्रयोगात संशोधनात असे आढळले की, १२०० पैकी १६३ ज्येष्ठ नागरिकांना स्मरणशक्तीशी निगडित समस्या आढळल्या. या संशोधनातून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की, अधिक कॅलरीचे भोजन केल्यानेच स्मरणशक्तीस दुप्पट धोका निर्माण होतो.
तसेच स्मरणशक्ती कमकुवत झाल्याने स्टड्ढोक, मधुमेह व खिन्नतेची शक्यता वाढते. या प्रयोगातील ज्येष्ठ नागरिकांचे तीन गट करण्यात आले होते. पहिल्या गटास दररोज ६००-१५०० कॅलरी, दुस-या गटास १५००-२१०० कॅलरी आणि तिस-या व अखेरच्या गटास २१००-६००० कॅलरी आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला. तिन्ही गटांचा तुलनात्मक अभ्यास केला असता, आढळले की, दुस-या व तिस-या गटातील नागरिकांपेक्षा पहिल्या गटातील नागरिकांच्या स्मरणशक्तीवर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नव्हता.