आरोग्यानामा ऑनलाईन टीम : काही लोक जेवण करताना सारखे पाणी पितात. तर काहींना जेवण झाल्यावर ताबडतोब ढसाढसा पाणी पिण्याची सवय असते. अशी सवय अतिशय घातक ठरू शकते. विशेष म्हणजे जेवताना पाणी पिणे आरोग्यासाठी खूपच घातक आहे. जेवताना पिण्याचे कोणते तोटे आहेत. कोणती काळजी घ्यावी, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
जेवताना पाणी पिण्याचे तोटे
१ जेवण करताना पाणी प्यायल्यास शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते.
२ जेवताना पाणी प्यायल्यास शरीरातील इन्सुलिनचा स्तर वाढतो.
३ पचनक्रियेवर प्रभाव पडतो.
४ जेवताना पाणी प्यायल्यास अन्न पचनाची प्रकिया हळुवार होते.
५ पोटाचे विकार होतात.
हे लक्षात ठेवा
* जेवण आणि पाणी पिण्यामध्ये अंतर ठेवण्यास सांगितले आहे.
* पाणी प्यायल्याने ही जठराग्नी समाप्त होते.
* जठराग्नी जेवण पचल्यानंतर शरीराला मुख्य उर्जा आणि प्राण प्रदान करते.
* जेवण केल्यानंतर पाणी प्यायल्याने जेवण पचत नाही. गॅस आणि अॅसिडी निर्माण होतो..
* महर्षि वाघभट्ट यांनी १०३ रोगांचा उल्लेख केला आहे. जे भोजन केल्यानंतर पाणी प्यायल्याने होतात.
अशी घ्या काळजी
१ जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर जेवणाआधी भरपूर पाणी प्यावे.
२ जेवण योग्य प्रकारे चावून खाल्लास पचन चांगलं होतं.
३ जर जेवण केल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यास अपचनाचा त्रास होणार नाही.
४ जेवण करताना अधिक तिखट किंवा मसालेदार पदार्थ खात असाल तर थोडं पाणी प्यावे.
Visit : arogyanama.com