हे आहेत फायदे आणि तोटे
दिर्घ आयुष्य
जमिनीवर पद्मासनात बसणारे किंवा सुखासनात बसल्यास आणि कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता उठून उभे राहण्यास सक्षम असणारे, दीर्घ काळ जगू शकतात. या मुद्रेतून उठण्यासाठी जास्त लवचिकपणा आणि शारीरिक शक्तीची आवश्यकता असते. जे लोक कोणत्याही आधाराशिवाय उठून उभे राहण्यास सक्षम नसतात, त्यांची पुढील सहा वर्षात मृत्यूची शक्यता ६.५ पटीने जास्त होते, असे एका संशोधनात म्हटले आहे.
डोकं शांत राहते
सुखासनात बसून जेवण केल्यास मेंदू तणावरहित राहतो. जमिनीवर बसून जेवण केल्यांनतर एकाग्रता वाढते. मन शांत ठेवून जेवण केल्यास अन्न व्यवस्थित पचते तसेच जेवल्यानंतर संतुष्टतेची जाणीव होते.
वजन नियंत्रणात राहते
सुखासनात बसल्याने मेंदू शांत होतो. जेवणावर लक्ष केंद्रित होते. डायनिंग टेबलवर जेवण न करता सुखासनात बसून केल्याने खाण्याची गती संथ होते. यामुळे पोट आणि मेंदूला योग्य वेळेवर तृप्तीची जाणीव होते. सुखासनात बसून जेवण केल्याने गरजेपेक्षा जास्त जेवण पोटात जात नाही. जमिनीवर बसून जेवन केल्यानंतर पोट सुटत नाही. शिवाय अपचन, जळजळ, पोटासंबधीत विकार होत नाहीत.
पचनक्रिया
पद्मासनात बसल्यावर नाभी, पाठीचा खालील भाग, पोटाच्या जवळपासच्या आणि पोटाच्या मांसपेशी ताणल्या जातात. यामुळे चयापचय क्रिया व्यवस्थित होते. या स्थितीमुळे पोटावर अतिरिक्त दबाव पडत नाही. यामुळे खाण्यात आणि अन्न पचवण्यास मदत मिळते.
अन्न पचन
सुखासनात बसून जेवण केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. जमिनीवर बसून जेवताना थोडेसे पुढे वाकावे लागते. तसेच अन्न गिळण्यासाठी पुन्हा पूर्वस्थितीमध्ये यावे लागते. वारंवार पुढे आणि मागे वाकल्यामुळे पोटातील मांसपेशी सक्रिय होतात. पोटातील अॅसिडही वाढते. यामुळे अन्न पचवणे सोपे जाते.