आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : वृत्त संस्था: कोरोनाचा हाहाकार पाहून लोकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील बाधितांचा आकडा 67,57,132 झाला आहे तर मृतांचा आकडा 1,04,555 झाला आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून लोक आता विविध उपाय करताना दिसत आहेत. अनेकजण आयुर्वेदीक काढा घेत आहेत. रोगप्रतिकारक शक्तीसाठी हा काढा(ayurvedic extract) घेतला जात आहे. परंतु आयुर्वेदीक काढ्याबद्दलही(ayurvedic extract) अनेकांच्या मनात विविध शंका आहेत.
आयुर्वेदीक काढा दीर्घकाळ घेतल्यानंतर यकृताला नुकसान होतं का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र आयुष मंत्रलयानं दाव्याचं खंडन केलं आहे. आयुर्वेदीक काढा घेतल्यानं यकृताला नुकसान पोहोचतं ही धारणा चुकीची असल्याचं आयुष मंत्रालयानं म्हटलं आहे. कारण काढा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वस्तू घरात जेवण बनवताना वापरल्या जातात असंही आयुष मंत्रालयानं म्हटलं आहे. दालचिनी, तुळस, आणि काळी मीरीचा उपयोग काढा बनवण्यासाठी केला जातो आणि त्याचा श्वसनयंत्रणेवर चांगला परिणाम होतो अशी माहिती आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी दिली आहे.
दिवसातून 2 वेळा काढा घेणं आरोग्यासाठी उपयुक्त
आयुष मंत्रालयानं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा पिण्याचा सल्ला दिला आहे. मंत्रालयानं अन्य पदार्थांसोबत तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ यांचा उपयोग करून काढा बनवण्याचा सल्ला दिला आहे. हा काढा दिवसातून 2 वेळा घेणं आरोग्यासाठी उपयुक्त आहे असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटनं याबाबत वृत्त दिलं आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या गाईडलाईन्स पुढीलप्रमाणे –
– कमीत कमी 30 मिनिटांपर्यंत योगा किंवा ध्यान करणं आवश्यक आहे.
– जेवण बनवत असताना हळद, जीरे, धणे, यांचा जास्तीत जास्त वापर करा.
– डायबिटीज असलेल्या रुग्णांनी साखर नसलेल्या च्यवनप्राशनचं सेवन करावं.
– दिवसातून 2 वेळा हर्बल टी, तुळशी, दालचिनी, काळी मिरी, सुकलेल्या आल्याच्या काढ्याचं सेवन करा.
– हळदीचं दूध प्या.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.