आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळी उठल्यावर रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यावे, असे तज्ज्ञ सांगतात. यामुळे आरोग्य चांगले राहते. परंतु, जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने सुद्धा अनेक फायदे होतात. यामुळे हार्ट डिसिज आणि कँसरसारख्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो. रोज जेवणानंतर दोन ग्लास कोमट पाणी प्यायले तर अनेक आरोग्य समस्या नियंत्रित होऊ शकतात. रोज कोमट पाणी प्यायल्याने कोणते फायदे होतात, याविषयी जाणून घेवूयात.
हृदयरोग
जेवण केल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यास जेवण योग्य प्रकारे डायजेस्ट होते. जेवणाचे रुपांतर फॅटमध्ये होत नाही. कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोल राहते. यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो.
वजन
रोज जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील जादा चरबी घटते. यामुळे वजन कमी होते.
बॉडी टॉक्सिन्स
रोज जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने बॉडीचे टॉक्सिन्स बाहेर निघतात. यामुळे शरीर निरोगी राहते.
डायजेशन
जेवणानंतर रोज कोमट पाणी प्यायल्याने डायजेशन सुधारण्यात मदत होते.
बध्दकोष्ठता
रोज कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होऊन बध्दकोष्ठतेची समस्या दूर होते.
इन्फेक्शन
रोज कोमट पाणी प्यायल्याने बॉडीची इम्यूनिटी वाढते. यामुळे सर्दी, खोकला आणि ताप, असे आजार दूर राहतात.
थ्रोट इन्फेक्शन
रोज जेवणानंतर कोमट पाणी प्यायल्याने घशातील बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे थ्रोट इन्फेक्शनपासून आराम मिळतो.