होऊ शकतात या समस्या
* नऊ महिने पुर्ण होण्यापुर्वीच बाळाचा जन्म झाला तर त्याला म्हातारपणी मानसिक आजार होण्याचा धोका असतो.
* फुफ्फुसांची वाढ न झाल्याने मूल योग्य प्रकारे श्वास घेऊ शकत नाही. त्यामुळे ऑक्सीजन कमी पडल्याने शरीरातल्या सर्वच अवयवांचे काम कमी-कमी होऊन मृत्यू येऊ शकतो. यासाठी प्राणवायूचा सतत पुरवठा करावा लागतो.
* अशा मुलांचा श्वास बंद पडत असेल तर सतत लक्ष ठेवावे लागते. त्यासाठी बाळाचा श्वास थांबला आहे हे सांगणारी यंत्रे आता उपलब्ध आहेत. असा श्वास थांबल्याचा इशारा या यंत्रामार्फत मिळाला की लागलीच त्याला परत श्वास घेण्यासाठी मदत करावी लागते किंवा कृत्रिम श्वास द्यावा लागतो.
* या मुलांच्या रक्तातल्या साखरेचे प्रमाण अनेकदा कमी होते. शरीरातल्या सर्व संस्थांच्या व्यवस्थित कार्यक्षमतेसाठी विशिष्ट प्रमाणात साखर मिळावी लागते. नाहीतर श्वास थांबणे, झटके येणे, बेशुध्द होणे इ. प्राणघातक गोष्टी होऊ शकतात.
* या मुलांना जन्मानंतर पहिल्या काही दिवसात काही जीवघेणे किंवा गंभीर असे आजार होऊ शकतात. कारण या मुलांची वाढ अपुरी झालेली असते.
* रोगप्रिकारक क्षमता कमी असते. या मुलांना आरोग्य समस्यांचा सामाना जास्त करावा लागतो.