आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पाणी हे जीवन असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक सजिवासाठी पाणी हे खुप महत्वाचे आहे. पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. यावरून पाण्याचे महत्व अधोरेखित होते. मात्र, शरीराला पाण्याची आवश्यकता कशासाठी असते. त्यामागील कारणे कोणती याविषयी अनेकजणांना माहिती नसते. पाणी प्यायल्यानंतर त्याचे पुढे काय होते, कशासाठी हे पाणी शरीरात वापरले जाते याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
शारीरिक तंत्राची कार्यक्षमता कायम राखण्यात पाण्याची भूमिका खूप महत्त्वाची असते. पाण्याअभावी शरीराच्या अंतर्गत अवयवांची कार्यप्रणाली बाधित होऊ शकते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे गरजेचे असते. यावरच शरीराची कार्यप्रणाली अवलंबून असते. दिवसभर कामात गुंतलेले असल्याने अनेकजण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांची ऊर्जा पातळी खालावते. शरीराचा परफॉर्मन्स चांगला राखण्यासाठी आणि फोकस वाढवण्यासाठी पाणी पिणे खूप गरजेचे आहे.
शास्त्रज्ञांनी मायग्रेन या आजाराने ग्रस्त असलेल्या काही रूग्णांवर संशोधन केले. या संशोधनासाठी या रूग्णांना दोन गटात विभागण्यात आले होते. एका गटाला प्लेसबो हे औषध घेण्यास आणि दुसऱ्या गटाला दीड लिटर पाणी पिण्यास सांगितले. दोन आठवड्यांनंतर अध्ययन केल्यावर पाणी पिणाऱ्या गटातील लोकांना दुसऱ्या गटाच्या तुलनेत कमी त्रास झाल्याचे आढळून आले होते. पुरेसे पाणी न प्याल्याने डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता भासते. यामुळे अन्न पचत नाही, थकवा येतो आणि डोके दुखायला लागते. अशा वेळी किडनीची कार्यप्रणालीदेखील बाधित होते.
मानवी मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी पाण्याची सर्वाधिक गरज असते. पाण्यामुळे कॉग्निटिव्ह परफॉर्मन्स ३० टक्क्यांपर्यंत वाढतो. तज्ज्ञांच्या मते पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट पाहू नये. थोडे-थोडे पाणी पीत राहणे आवश्यक आहे. जे लोक वजन कमी करण्यासाठी पर्शिम घेतात त्यांनी पाणी भरपूर प्यायले पाहिजे. १७ अंश म्हणजेच ०.५०२ लिटर पाणी प्यायल्याने मेटाबॉलिक रेट ३० टक्क्यांपर्यंत वेगवान होऊ शकतो, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.