आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात काही वस्तूंचा आहारात समावेश केल्यास रोग प्रतिकारक्षमता वाढू शकते. तसेच या काळात होत असलेल्या संसर्गापासून संरक्षण होऊ शकते. पावसाळ्यात दररोज तीन-चार तुळशीची पाने खावीत. यात अँटीव्हायरल एजंटसह अँटीऑक्सीडेंटसही भरपूर असते. सलादमध्ये तुळशीची ३-४ पाने टाकावीत. तसेच ही पाने धुवून गुळासोबत सुद्धा खाता येतील. तुळशीचा हर्बल चहादेखील पिऊ शकता.
हे उपायही करून पहा
* पावसाळ्यात सूप बनवताना त्यात लसणाच्या काही पाकळ्या टाकाव्यात. लसणामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहरे टाकली जातात. लसूण वाळवून, भाजून भाज्यांमध्ये मसाल्यांसोबत याचा उपयोग करता येतो. भाजलेला लसूण लाभदायक असतो.
* नारळ पाण्यात इलेक्टक्ट्रॉलाइट्स आणि मिनरल्स भरपूर असतात. हे शरीराला हायड्रेट ठेवतात. पावसाळ्यात आजारांपासून वाचवण्यासाठी नारळ पाणी गुणकारी आहे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. नारळ पाणी यकृत आणि पोटासंबंधी आजार दूर करतात.
* एलोवेरामध्ये व्हिटामिन्स, एंजाइम्स आणि प्रोटीनची मात्रा अधिक असल्याने रोगप्रतिकारशक्ती आणि रक्तप्रवाह वाढतो. हृदय आणि यकृताच्या आजारांपासून बचाव होतो. सर्दी-पडसे, घशाचा त्रास असल्यास हे पिऊ नये.
* पावसाळ्यात पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी जिरे फायदेशीर आहे. यातील अँटीऑक्सिडेंटस पचनक्रिया मजबूत करते. ताप कमी करण्यास हे उपयोगी आहे. केस गळत असल्यास जिरे खावे. त्वचेसंबंधी समस्या दूर करण्यासही हे उपयोगी आहे.