आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोरोनापासून (corona) दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे आपली रोगप्रतिकारक शक्ती. (Immunity) यासाठी जवळपास सर्वजण खाण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण अधिकचा आहार घेत आहोत. ज्यामुळे अनेकांचे वजन वाढले आहे. त्यासाठी एका पेयाविषयी माहिती…. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती Immunity वाढेलच आणि तुमचे वाढलेले वजन कमी होण्यास देखील मदत होईल.
लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या
यासाठी आपल्याला हिंग, काळी मिरी, लसूण, कढीपत्ता, तुळशीची पाने, आद्रक आणि गुळ लागणार आहे. सर्वात प्रथम दोन ग्लास पाणी घ्या आणि त्यात काळी मिरी आणि हिंग मिक्स करा. हे पाणी उकळण्यासाठी गॅसवर मंद आचेवर ठेवा. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता, आद्रक आणि लसूण घ्याला. हे पाणी ज्यावेळेला गरम करण्यासाठी ठेवता त्यावेळी प्लेटने हे पाणी झाकून ठेवा. शेवटी यामध्ये गुळ घाला आणि वीस मिनिटे उकळू द्या. त्यानंतर हे पाणी ग्लासमध्ये घ्या आणि प्या. हे खास पेय पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते शिवाय वजनही कमी होण्यास मदत होते. कोरोनाच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती Immunity वाढवण्यासाठी गुळवेल अत्यंत फायदेशीर आहे. हे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करते. गुळवेलमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत.
Gargle Effect On Corona : एका दिवसात किती वेळा गुळण्या कराव्यात, जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
गुळवेलचा काढा
जे रोगप्रतिकारक शक्ती Immunity वाढविण्यात मदत करतात. गुळवेलमुळे सांधेदुखी, त्वचेची अॅलर्जी, सर्दी आणि खोकला यासारख्या समस्यापासून मुक्त होण्यास मदत होते. गुळवेलचा काढा तयार करण्यासाठी आपल्याला २ कप पाणी, गुळवेलच्या २ लहान फांद्या, २ दालचिनीच्या काड्या, ५ तुळशीची पाने, ८ पुदीनाची पाने, २ चमचे मध, अर्धा चमचे हळद, १ चमचे मिरपूड आणि आले आवश्यक आहे. सर्व प्रथम, मध्यम आचेवर पॅनमध्ये २ कप पाणी घाला. आता त्यात गुळवेल घाला. नंतर सर्व साहित्य घाला. अर्धा तास हे पाणी उकळी येऊ द्या. उकळल्यानंतर हा काढा थंड करून चाळून घ्या. दररोज दिवसातून एकवेळा तयारी गुळवेलचा काढा घेतला पाहिजे. हा काढा आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतली पाहिजे. हा काढा घेतल्यानंतर साधारण एकादा तास आपण काहीही खाल्ले नाही पाहिजे. जर आपल्याला शक्य असेल तर हा काढा आपण रात्री जेवनानंतर घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
सर्दी-तापाचा Virus करू शकतो कोरोनावर मात, वैज्ञानिकांचा दावा
पोटाची चरबी कमी करायची असेल तर आहारात समाविष्ट करा ‘ही’ 5 फळे, जाणून घ्या
कोविड-19 आणि ब्लॅक फंगस संसर्ग एकाच वेळी होऊ शकतो का? जाणून घ्या
‘कोरोना’मुक्त झाल्यानंतर सर्वप्रथम टूथब्रश बदला, अन्यथा दुसर्यांदा होऊ शकता ‘शिकार’, जाणून घ्या