आरोग्यानामा ऑनलाइन टीम – रात्रीचे जेवण हलके-फुलके घ्यावे, असा सल्ला आहारतज्ज्ञ देत असतात. यापाठी मागे अनेक कारणे आहेत. यासाठी रात्रीच्या जेवणात अधिक तेल- मसाल्यांचा वापर करू नये. पचनास जड असलेले अन्न खाऊन झोपल्याने पचनक्रिया व्यवस्थित होत नाही. पोट जड वाटणे किंवा मलावरोध असे त्रास या आहारामुळे होतात. शिवाय, असा आहार घेतल्याने झोपही व्यवस्थित पूर्ण होत नाही.
रात्रीच्या जेवणात मांसाहारी पदार्थांचा समावेश करू नये. कारण, मांसाहारी पदार्थ पचण्यास खूप जड असतात. मांसाहारी पदार्थ खाण्याची खूपच इच्छा झाल्यास ते अतिशय कमी प्रमाणात खावेत. रात्रीच्या वेळी मेटाबॉलिक रेट दिवसाच्या तुलनेत मंद असल्याने रात्री कधीही पोटभर जेवण करू नये. हलके जेवण केल्याने पचनक्रियेला जास्त मेहनत करावी लागत नाही. मसालेदार जवेण रात्रीच्य आहारात घेतल्यास ढेकर येणे, पोटात दाह होणे आणि गॅसेसचा त्रास होतो. म्हणून रात्रीच्या जेवणात मसाल्यांचे प्रमाण खूप कमी असावे. रात्रीच्या वेळी जेवणात नियमितपणे सलाडचा समावेश करावा.
चव येण्यासाठी चिमूटभर मीठ, मिरेपूड आणि लिंबाच्या रसाचे काही थेंबही टाकावेत. रात्रीच्या जेवणात सर्व प्रकारच्या भाज्यांपासून तयार करण्यात आलेले सूप घेणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. हे सूप पचण्यास हलके असते. शिवाय त्यामध्ये अनावश्यक कॅलरीही नसते. रात्री जेवल्यानंतर ताबडतोब झोपू नये. यामुळे जेवण पचन होणार नाही. जेवण आणि झोपेत दोन ते तीन तासांचे अंतर असावे, असे तज्ज्ञ सांगतात. जेवण केल्यावर लगेच झोपायचे असेल तर शतपावली करावी आणि नंतर झोपावे. शतपावलीमुळे जेवणाचे पचन लवकर होते. रात्री जेवण केल्यानंतर फळांचे सेवन करणेही लाभदायक आहे. परंतु, केळी आणि आंबा यासारखी फळेरात्री झोपताना खाऊ नये. आंबट फळे, बॅरीज आणि कलिंगड या फळांचे सेवन रात्री जेवणानंतर खाल्ल्यास त्याचा शरीराला लाभ होऊ शकतो. जेवण केल्याच्या अर्ध्या तासानंतरच फळांचे सेवन केले पाहिजे.