आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वजन वाढल्यानंतर गोड पदार्थ खाऊ नये असा सल्ला तज्ज्ञ देतात. गोड पदार्थ अहारात जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढते. मात्र वजन कमी करण्याचा एक गोड उपाय सुद्धा आहे. हा उपाय केल्यास वजन कमी होऊ शकते. गोड पदार्थ आवडीने खाणाऱ्या व्यक्तिलाही यामुळे वजन कमी करता येईल. यामुळे शरिरातील उष्णता कमी होते. शिवाय डायबिटीज, ब्लड प्रेशर असलेल्या रूग्णांसाठीही हा उपाय लाभदायक आहे. हा गोड पदार्थ म्हणजे गव्हाची खीर होय.
खीर तयार करण्याचे साहित्य
गहू एक कप, दुध चार कप, एक चमचा तूप, बदाम तीन चमचे, साखर पाच मोठे चमचे, चिमुटभर इलायची पावडर
अशी करा खीर
* प्रथम तुप गरम करा.
* तीन चमचा बदामाचे तुकडे टाकून परतून घ्या.
* थोड्या वेळाने या मिश्रणात दुध टाका.
* मिश्रण चांगले तापल्यानंतर यामध्ये भरडलेले गहू, साखर, खोबरे टाकून उकळी येईपर्यंत ढवळत राहा.