आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सायनसची समस्या हिवाळ्यात अधिक होते. शिंक येणे, नाक वाहणे, डोकेदुखी, डोके किंवा डोळ्यांवर दबाव जाणवणे, हलका ताप येणे आणि भूक न लागणे ही लक्षणे दिसून येतात. त्यामुळे खाणेपिणे आणि जीवनशैलीबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. सायनसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण माहिती घेऊयात.
सायनसचा त्रास टाळायचा असेल तर फ्रिजमध्ये ठेवलेले कोणतेही खाद्यपदार्थ काढून लगेचच खाऊ नये. असे करणे सायनस असलेल्या लोकांसाठी घातक ठरू शकते. आहारात मिठाचा वापर जास्त प्रमाणात करू नये. कारण मिठामुळे उतींमध्ये द्रव एकत्र होऊ लागते. अशावेळी सायनस इन्फेक्शन आणखी वाढू शकतो.
तळलेले, मसालेदार, स्टार्चयुक्त, तांदूळ तसेच मैद्यापासून बनवलेले केक, पाय, मॅक्रोनी यासारखे खाद्यपदार्थ आणि साखर किंवा कँडी यापासूनही दूर राहणे गरजेचे आहे. दूध, दही, काशीफळ, पालेभाज्या, टोमॅटो आणि पपईचे सेवन करावे. कारण यामध्ये भरपूर अ जीवनसत्त्व असते. दुधातून भरपूर कॅल्शियम मिळते आणि सायनस असलेल्यांसाठीही हे लाभदायक आहे. पीडिताने शिळे अन्न खाऊ नये. २०० मिली पालकाच्या ज्यूसमध्ये ३०० मिली गाजराचा रस मिसळून सेवन केल्यानेही सायनस असलेल्यांसाठी फायदा होतो.