आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आजच्या युगात मोबाईल हा मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला असून ही आता काळाची गरज आहे. यामुळे काम करताना,जेवताना,चालताना, बोलताना अगदी झोपताना देखील अनेकजण मोबाईल जवळ बाळगतात पण ही सवय कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.
मोबाईलचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यावर अनेक देशांमध्ये संशोधन करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक संशोधनात मोबाईलचा अतिवापर हा आरोग्याला घातक असल्याचे समोर आले आहे. यात गंभीर आजारांपासून मानसिक आजारांचा समावेश आहे.आंतरराष्ट्रीय कॅन्सर रिसर्च एजेंसीने दिलेल्या माहितीनुसार झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवणे अतिघातक आहे. कारण मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांमुळे मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे कानात व डोक्यात ट्यूमर तयार होतो. जो पुढे कॅन्सरमध्ये रुपांतरीत होतो.तसेच पुरुषांमध्ये नपुसंकता येण्याची शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे. काही पुरुषांना पँटच्या खिशात मोबाईल ठेवण्याची सवय असते. याचा थेट परिणाम शुक्राणूंवर होतो व शुक्राणूंची संख्या घटते. असे या संशोधनात आढळले होते.
तसेच गेल्या काही दिवसात झोपताना बाजूला ठेवलेल्या मोबाईलच्या स्फोटात अनेक जणांनी जीव गमावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. रात्रभर झोपताना मोबाईल जवळ ठेवल्यास रात्री लवकर झोप लागत नाही रात्रभर जागरण केल्यामुळे सकाळी उठल्यावर अशा व्यक्तींना निरुत्साहीपणा जाणवतो, थकवा येतो व शरीर जड होते.