आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मीठ जेवणाची रूजी वाढवते. परंतु, चुकून थोडे जरी जास्त मीठ जेवणात पडले तरी जेवणाची चव बिघडून जाते. यामुळे मीठ टाकण्याचे प्रमाण नेहमी योग्यच असावे लागते. अनेकदा गृहिणींकडून चुकून जास्त मीठ टाकले जाते. अशावेळी काय करावे, हे त्यांना सूचत नाही. परंतु, भाजी अथवा डाळ खारट झाल्यास अतिशय सोपे उपायक करून तुम्ही भाजीचा खारटपणा कमी करू शकता. हे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.
१ बटाटा
जेवणात मीठ जास्त झाले असेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे बटाट्याचे छोटे-छोटे तुकडे करून भाजीमध्ये टाका. थोडावेळ ते शिजल्यानंतर बाहेर काढा. यामुळे भाजीचा खारटपणा दूर होतो.
२ पीठाचा गोळा
भाजी खारट झाली असेल तर थोडे कणिक मळून त्याचा गोळा भाजीत टाका. थोडावेळ तसाच ठेवून नंतर काढून ठेवा, यामुळे खारटपणा कमी होतो.
३ दही
खारटपणा कमी करण्यासाठी भाजीमध्ये थोडे दही सुद्धा टाकू शकता.
४ लेमन ज्यूस
डाळ अथवा भाजीमध्ये मीठ जास्त पडल्यास त्यामध्ये थोडा लेमन ज्यूस टाकल्यास खारटपणा कमी होतो.
५ ब्रेड
भाजी खारट झाली असेल तर यामध्ये ब्रेडचे तुकडे टाकले तर खारटपणा कमी होतो.