आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पूर्वी लोक फुटाणे आवर्जून खात असत. मात्र, अलिकडे पॅकेजड् फूड आणि फास्ट फूडमुळे फुटाणेसारखे खाद्य खुपच कमी प्रमाणात सेवन केले जाते. त्यामुळे यातील औषधी गुणांपासून आपण दूर राहतो. दररोज ५० ग्रॅम फुटाणे खाणे शरीरासाठी चांगले आहे. फुटाणे आणि हरभऱ्याची डाळ शरीरासाठी पौष्टिक आहे. फुटाणे खाल्ल्याने अनेक आजार दूर राहतात. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, आयर्न, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते.
मधुमेह, काविळीसाठी उपयोगी
सरासरी १०० ग्रॅम फुटाण्यांमध्ये २२.५ ग्रॅम प्रोटिन्स, ५.२ ग्रॅम फॅट, १ ग्रॅम फायबर आणि ९.५. ग्रॅम लोह असते. मधुमेही रुग्णाने दररोज सकाळ व सायंकाळी ५० ग्रॅम फुटाणे खाल्ले तर तीन दिवसात त्याच्या इन्सुलिनची मात्रा २० टक्क्याने कमी होते. कावीळ झाली असेल तर १०० ग्रॅम हरभरा डाळ दोन ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवावी. त्यानंतर डाळ पाण्यातून काढून त्यामध्ये १०० ग्रॅम गुळ मिसळून ४-५ दिवस या मिश्रणाचे सेवन केल्यास कावीळ बरी होते.
कमजोरी दूर होते
फुटाणे नियमित खाल्ल्याने सौंदर्य खुलते तसेच स्मरणशक्ती वाढते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी दररोज नाष्ट्यात फुटाणे खावेत. मातीच्या भांड्यात रात्री फुटाणे भिजवून ठेवावे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर भिजवलेले फुटाणे चावून-चावून खावेत. या उपायाने विर्यात वृद्धी होते तसेच पुरुषाच्या कमजोरीशी संबंधित समस्या दूर होते. भिजवलेले फुटाणे खाल्ल्यानंतर त्यावर दूध प्यावे, यामुळे विर्यातील पातळपणा दूर होतो. गुळ आणि फुटाण्याचे नियमित सेवन केल्यास मुत्ररोगाशी संबधित समस्या दूर होतात. दररोज भाजलेले फुटाणे खाल्ल्याने मुळव्याधीचा त्रास कमी होतो.
जलोदर रोग दूर होईल
रात्री हरभरा डाळ भिजवून ठेवावी. सकाळी ही डाळ बारीक वाटून घ्यावी आणि साखरेच्या पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे. यामुळे मानसिक तणाव कमी होतो. ५० ग्रॅम फुटाणे उकळून घ्यावे आणि त्याच उकळलेल्या पाण्यामध्ये ते बारीक करावेत. हे कोमट पाणी एक महिनाभर पिल्यास जलोदर रोग दूर होईल. गर्भवतीला उलट्या होत असतील तर भाजलेल्या फुटण्याचे सूप पाजावे. पोट फुगणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पाय सुजणे, ही जलोदर रोगाची लक्षणे आहेत.
त्वचारोग, दम्यावर गुणकारी
हरभरा पिठाच्या मीठ न घालता केलेल्या पोळीचे ४० ते ६० दिवस सेवन केल्यास त्वचेशी संबंधित आजार दूर होतील. भाजलेले फुटाणे रात्री चावून खावेत आणि त्यानंतर गरम दुध प्यावे. या उपायाने श्वासानाशी संबधित रोग तसेच कफ दूर होतो. हरभरा पिठाचा हलवा थोडे दिवस नियमित खाल्यास वाताच्या आजारांमध्ये व दम्याचा त्रास दूर होतो.
हरभरा पिठाच्या मीठ न घालता केलेल्या पोळीचे ४० ते ६० दिवस सेवन केल्यास त्वचेशी संबंधित आजार दूर होतील. भाजलेले फुटाणे रात्री चावून खावेत आणि त्यानंतर गरम दुध प्यावे. या उपायाने श्वासानाशी संबधित रोग तसेच कफ दूर होतो. हरभरा पिठाचा हलवा थोडे दिवस नियमित खाल्यास वाताच्या आजारांमध्ये व दम्याचा त्रास दूर होतो.