आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही वेळा अतिशय साधी गोष्ट सुद्धा अनेक प्रयत्न करूनही आठवत नाही. सतत ध्यानात असलेली एखादी साधी गोष्ट योग्य वेळी न आठवणे हे कधी कधी खूपच त्रासदायक ठरते. बुद्धी कमजोर असल्यास असे प्रसंग वारंवार घडू लागतात. ही समस्या दूर करायची असल्यास अनेक घरगुती उपाय आहेत. काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास अल्झायमर्ससारखा रोग सुद्धा टाळता येतो. मेंदूची शक्ती वाढविण्यासाठी आणि विसरण्याचा आजार दूर करण्यासाठी काही उपाय आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय करा
* दह्यातील अमायनो अॅसिडमुळे मानसिक तणाव कमी होतो आणि स्मरणशक्ती वाढते.
* रोज थोडे अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.
* स्ट्रॉबेरी नियमित सेवन केल्यास स्मृतीभ्रंशाचा धोका दूर करतात.
* ऑलिव्ह हे स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करते.
* जायफळच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते.
* हळदीच्या नियमित सेवनाने अल्झायमर रोग होत नाही. मेंदूतल्या खराब पेशींना दुरूस्त करण्याचे काम करते.
* टोमॅटोमधील लायकोपिन मेंदूतल्या पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते.
* दालचीनीच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते आणि डोकं स्वस्थ राहते.
* रोज सफरचंदाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते.