आरोग्यनामा ऑनलाइन टीम – रोज आवळा ज्यूस सेवन केल्याने आयुष्य वाढते, असे म्हटले जाते. आयुर्वेदातही आवळ्याचे महत्व सांगण्यात आले आहे. आवळा ज्यूसमध्ये मध मिसळून प्यायल्याने दम्याचा प्रभाव कमी होतो. हे रक्त शुध्द करण्यासाठी गुणकारी आहे. रोज दोन चमचे आवळा ज्यूस प्यायल्यास कोणते फायदे होतात, याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
१ कोलेस्टेरॉल कमी होऊन हृदरोगाची शक्यता कमी होते.
२ मेटाबॉलिज्म व्यवस्थित होऊन वजन कमी होते.
३ डायजेशन चांगले होते.
४ चेहरा चमकतो, त्वचारोग दूर होण्यास मदत होते.
५ यामुळे लघवीसंबंधी आजार दूर होतात.
६ पीरियड्ससंबंधी समस्या दूर होतात.
७ डायबिटीज नियंत्रणात राहतो.
८ डोळ्यांची शक्ती वाढते.
९ तोंड येण्याची समस्या दूर होते.
१० किडनी स्टोनचा आजार दूर होतो.