आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्लास्टीक बॉटलीतील केमिकल आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. यामुळे प्लास्टीकच्या बॉटलीतून पाणी पिणे धोकादायक आहे. यासाठी मिनरल वॉटर किंवा कोल्ड्रिंकच्या वापरलेल्या बाटल्यांमध्ये पाणी भरून ठेवू नये. बॉटल्स गरम ठिकाणी ठेवल्यास केमिकल्स वेगाने वाढतात. या केमिकल्समुळे कँसरसारखा जीवघेणा आजारही होऊ शकतो.
हे आहेत धोके
१ नर्व्हस सिस्टिम खराब होते. न्युरॉलॉजिकल डिसऑर्डरची समस्यासुद्धा होऊ शकते.
२ शरीरात धोकादायक टॉक्सिन्स तयार होतात. हार्मोन्स संतुलन बिघडते.
३ लिव्हर आणि ब्रेस्ट कँसरचा धोका वाढतो.