आरोग्यनामा ऑनलाइन टीम : बदललेल्या जीवनशैलीमुळे चूकीच्या आहाराचे दुष्परिणाम आणि मनावर येणारा ताणतणाव वाढत चालला आहे. तसेच वजन वाढल्यामुळे थकवा, न्यूनगंड आदी समस्यादेखील वाढत चालल्या आहेत. विविध आजार सुद्धा यामुळे बळवतात. उदाहरणार्थ डायबिटीस, ब्लड प्रेशर, डिप्रेशन इत्यादी आजार वाढत आहेत. चाळीशीनंतर वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी काही सोपे उपाय असून ते नियमित केल्यास वजन नियंत्रणात राहू शकते.
अक्रोड
अक्रोडमधील प्रोटीन आरोग्यदायी असून यामुळे शरीर सडपातळ होऊ शकते.
तिखटात चरबी कमी करणारे कॅस्पिनॉइड असते. २००९ मध्ये अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनात एका स्वयंसेवकाने दररोज ६ ग्रॅम कॅस्पिनॉइड ऑइलचे सेवन केले. त्यामुळे त्याचे वजन ५ पट वेगाने कमी झाल्याचे दिसून आले.
काळे सोयाबीन
काळ्या सोयाबीनच्या सेवनाने स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. तसेच याच्या सेवनाने चरबी वेगाने कमी होते. वजनावरही नियंत्रण मिळवता येते.
बटाटे खा
हार्वर्डच्या एका अभ्यासात सांगण्यात आले आहे, बटाटा खाणे कमरेसाठी सर्वाधिक घातक आहे. परंतु तळलेल्या बटाट्याबद्दल हे सांगितले गेले आहे. भाजलेल्या किंवा उकडलेल्या बटाट्यावर काळी मिरी आणि मीठ टाकून खाणे हा चांगला आहार आहे. रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे उपयुक्त आहे. बटाटे उकडून दह्यासोबत खावेत.
खरबूज
खरबूजच्या सेवनामुळे ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. यामध्ये केवळ ४५ कॅलरी असते. गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास खरबूज आरोग्यदायी आहे.
पत्ताकोबी
आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने १० टक्के कॅलरी कमी करता येते. दररोज २ कप कोबीच्या पानांचा रस खाल्याने ११३ टक्के अधिक मात्रेत व्हिटॅमिन-ए मिळते.
पनीर
वाढत्या वयाबरोबर स्नायू कमजोर होतात. चयापचय प्रक्रिया क्षीण होते. व्हे-प्रोटीनपासून बनलेल्या कॉटेज पनीरमुळे स्नायू कणखर बनतात. याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते.