आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चांगल्या आरोग्यासाठी दैनंदिन आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आहार पचण्यास हलका असावा. खूप गरम-गरम आणि उशिरा पचणारे पदार्थ खाण्यात आल्यास आजारपण येते. जेवताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, याची माहिती करून घेतली पाहिजे. अलिकडे जेवण करण्याची पद्धतही खूप बदलली आहे. त्याचाही आरोग्यावर परिणाम होत आहे. पूर्वी राजे-महाराजेसुद्धा जमिनीवर बसून जेवण करीत होते. जमिनीवर बसून जेवण करणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे.
ही काळजी घ्या
* वजन कमी करायचे असल्यास जेवताना प्रत्येक घास कमीत-कमी ३०-३५ वेळेस चावून खा. पौष्टिक आणि संतुलित आहार घेताना लोक घाई-गडबडीत १०-१५ वेळेसच अन्न चावतात. यामुळे पोटाच्या समस्या सुरु होतात. अन्न चावून-चावून खाल्यास बद्धकोष्ठता दूर होते, दात मजबूत होतात आणि अपचन होत नाही.
* उपाशी राहिल्याने वजन कमी होत नाही तर वाढण्याचा धोका राहतो. दिवसभरात व्यवस्थित वेळेवर योग आहार घेतल्यास पचनक्रिया संतुलित राहते. जे लोक सकाळी नाश्ता करत नाहीत त्यांची पचनक्रिया मंद राहते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि वजन वाढू लागते.
* जेवतांना पाणी प्यायल्यास पचनक्रियेवर प्रभाव पडतो. यामुळे जेवणाच्या अर्धा किंवा एक तास अगोदर पाणी प्यावे.
* वर्कआउट किंवा व्यायाम केल्यानंतर लगेच जेवण करू नये. शरीराला सामान्य तापमानावर येऊ द्यावे, त्यानंतरच जेवण करावे.
* काही लोक चव घेण्यासाठी वारंवार काहीतरी खात राहतात. पहिले खाल्लेले अन्न पचत नाही तोपर्यंतच दुसऱ्यांदा खातात. यामुळे पोटाचे आजार सुरु होतात. अन्न व्यवस्थित न पचल्यामुळे लठ्ठपणा वाढू लागतो.
* जेवणामध्ये कमीतकमी ६ तासांचे अतंर असावे. रात्रीचे जेवण पचण्यास वेळ लागतो, यामुळे डिनर लवकर करावे. नियमितपणे वेळेवर दिवसातून तीन वेळेस जेवण केल्यास एकाग्रता वाढते.
* खाण्याच्या पद्धतीमध्ये बदल करून मधुमेहापासून दूर राहणे शक्य आहे. हळू-हळू आणि चावून-चावून खाल्ल्याने ग्लुकोज तयार होण्याचे कार्य दुप्पट गतीने होते. यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी राहतो.
* जेवण करण्यापूर्वी दोन्ही हात चांगल्या पद्धतीने धुवून घ्यावेत. यामुळे हातावरील किटाणू नष्ट होतात आणि आजारापासून रक्षण होते.