आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एका अध्ययनातून असे समोर आले आहे की, किडनीच्या गंभीर दुखापतीच्या समस्येला तोंड देत असलेल्या लोकांमध्ये डिमेंन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंशाचा धोका वाढू शकतो. अशा लोकांमध्ये या मानसिक आजाराची तिपटीने जास्त जोखीम आढळून आली. या आजारामध्ये रुग्णाची स्मृती हळूहळू कमी होत जाते.
दुसरीकडे किडनीच्या गंभीर दुखापतीमुळे टाकाऊ उत्पादने रक्तात जमा होते आणि शरीरातील द्रवपदार्थ अंसतुलित होतात. त्यावर वेळीच उपचार न झाल्यास ही समस्या आणखी गंभीर रूप धारण करू शकते. अमेरिकेतील कोलोराडो विद्यापीठातील शास्त्रज्ञ जेसिका केंड्रिक यांनी सांगितले की, किडनी दुखापत पूर्णपणे बरी केली जाऊ शकते. या समस्येचा संबंध डिमेंन्शियासोबत आढळून आला आहे. या अध्ययनात शास्त्रज्ञांनी २ हजारांपेक्षा जास्त रुग्णांच्या माहितीचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. किडनीच्या दुखापतीने ग्रस्त बहुतांश रुग्णांमध्ये डिमेन्शियाचा धोका आढळून आला. सामान्य लोकांच्या तुलनेत त्यात डिमेन्शियाचा तिप्पट जास्त धोका आढळून आला.