आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या अनेक महिला नोकरी करतात. त्यामुळे त्यांना रोजच्या रोज किचन आवरायला वेळ मिळत नाही. पण पावसाळ्यात मात्र आपल्याला किचनची नीट स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. कारण पावसाळ्यात सगळीकडे अनेक जीवजंतू पसरतात. आणि ते जीवजंतू जर आपल्या आहारात मिसळले तर आपण आजारी पडू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात वेळात वेळ काढून किचनची काळजी घ्या.
१) पावसाळ्यात किचनची फरशी पुसताना ज्या कापडाने फरशी पुसणार आहात ते कापड चांगले पिळून घ्या. जेणेकरून फरशी ओली राहणार नाही. कारण फरशी जर ओली राहिली तर घरात बॅक्टरीया पसरतात. यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते.
२) घरातील चिप्स, पापड हे पदार्थ चिंबून जातात. त्यामुळे पावसाळा सुरु होण्याच्या आधी हे पदार्थ एका हवा बंद डब्यात भरून ठेवा.
३) पावसाळ्यात घरात झुरळांचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुमचा स्वयंपाक झाल्यानंतर घरातील सर्व पदार्थ चांगले झाकून ठेवा.
४) आपण वर्षभर पुरेल एवढा मसाला उन्हाळ्यातच करून ठेवतो. पण पावसाळ्यात मात्र हा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी हा मसाला एखाद्या डब्यात बंद करून ठेवा.
५) किचनच्या खिडक्या व्यवस्थित स्वच्छ करा. आणि काही वेळासाठी उघड्याच ठेवा. त्यामुळे किचनमध्ये ओलावा राहणार नाही. आणि त्याचा वासही येणार नाही.