आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आरोग्यासाठी भाज्या खुप आवश्यक आहेत. परंतु, भाज्या कशा खाव्यात हेदेखील महत्वाचे आहे. भाज्यांपासून जास्त फायदा करून घ्यायचा असल्यास त्या योग्यपद्धतीने खाव्यात. काही भाज्या सलाडमध्ये खाल्ल्या तर अधिक फायदेशिर ठरतात, तर काही उकडून, भाजून खाल्ल्या जातात. काही भाज्या उकडून खाल्ल्यास बॅक्टेरिया नष्ट होतात, शिवाय किडनी, लठ्ठपणा, आदींपासून बचाव होऊ शकतो. कोणत्या भाज्या उकडून खाल्ल्याने कोणते फायदे होतात, याविषयी माहिती घेवूयात.
हे आहेत फायदे –
१) बीन्स
हे उकडून खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. मधुमेहात फायदेशीर आहे.
२) मशरूम
उकडल्याने यामधील विषारी पदार्थ नष्ट होतात. हाडे मजबूत होतात.
३) टोमॅटो
उकडून खाल्ल्याने टोमॅटोमधील लायकोपिनची पातळी वाढते. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते. हृदयाच्या समस्यांपासून बचाव होतो.
४) पालक
हलके उकडल्याने यामधील ऑक्लेजिक अॅसिड लेव्हल कमी होते. यामुळे किडनीचे आजार होत नाहीत.
५) बटाटे
बटाट्यामधील कार्बोहायड्रेट उकडल्याने कमी होतात. यामुळे वजन नियंत्रणात राहते.
६) पत्ताकोबी
हे उकडल्याने यामधील टेपवर्म आणि हुकवर्मसारखे बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे वजन नियंत्रित राहते.
७) सिमला मिरची
उकडून खाल्ल्याने यामधील बीटा केरोटिनचे पूर्णपणे विघटन होते. यामुळे डोळे चांगले राहतात.
हे लक्षात ठेवा
* भाज्या उकडताना यामध्ये ऑलिव्ह ऑइल किंवा जवसाचे तेल मिसळावे. यामुळे जीवनसत्त्वे कायम राहतात.
* भाज्या उकळताना पाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवा. यामुळे भाज्यांमधील वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन नष्ट होत नाही.
* भाज्यांचे तुकडे मोठेच ठेवूनच उकळा. यामुळे यातील पोषकतत्वे टिकून राहतात.