पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – विजेचा धक्का लागून एखाद्याचा जीव जातो. किंवा त्याला इजा पोहचते. आणि त्या व्यक्तीचा तो अवयव काही काम करत नाही. असे आपण अनेक वेळा ऐकले आहे. त्यामुळे विजेच्या धक्याने माणसाच्या शरीराला हानी पोहचते. आणि विजेचा धक्का लागणे म्हणजे शरीराला खूप मोठा धोका पोहचतो. हीच माहिती आपल्याला माहित आहे. त्यामुळे आपण विजेच्या धक्याला खूप घाबरतो.
परंतु , आता काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण विजेचा धक्का लागल्याने शरीराला धोका नाही तर फायदा होणार आहे. कारण विजेच्या धक्यामुळे आता आपल्याला आपल्या मेंदूची क्रिएटिव्हिटी सुधारता येणार आहे. जर्मनीतील फ्रीबर्ग युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनी हे करून दाखवलं आहे. त्यामुळे आता विजेच्या शॉक म्हणजेच धक्क्याला घाबरायचं काहींच कारण नाही. कारण ते आपल्या शरीरासाठी फायद्याचे आहे.
डोक्याला इलेक्ट्रोड लावून विजेचे हलकेसे धक्के दिले जातात. यातून मेंदूच्या पेशी अधिक मेहनत करायला लागतात. मानसोपचार तज्न क्रिएटीव्हीटी मोजण्यासाठी या स्टेजचा उपयोग करतात. मेंदूच्या हा भाग समस्या सोडवणे, प्रश्नांवर उत्तरे देणे. अडचणी सोडवणे या कामाशी संबधित आहे.याद्वारे या अभ्यासकांनी मेंदूच्या उजव्या भागाची क्रिया वाढवणे यासाठी डाव्या भागाची क्रिया कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.