आरोग्यनामा ऑनलाईन टीम – तांब्या-पितळच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे. त्यामागे अनेक शास्त्रीय कारणे आहेत. तांब्या-पितळच्या भांड्यामध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे निर्जंतुक होते. शिवाय, आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात प्रविष्ट होतात. तांब्याच्या भाड्यांत कमीतकमी आठ तास ठेवलेले पाणीच उपयोगी ठरते. कफ असल्यास या पाण्यामध्ये तुळशीची पाने टाकावीत. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास कोणकोणते लाभ होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे
* त्वचा निरोगी ठेवायची असेल तर तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवून सकाळी हे पाणी प्यावे. नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचा उजळते.
* थायरॉइडचा आजारात तांब्याचा स्पर्श असलेले पाणी शरीरातील थायरॉक्सिन हार्मोनला संतुलित ठेवते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास हा आजार नियंत्रणात येतो.
* सांधेदुखी असल्यास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. तांब्याच्या भांड्यातील गुणामुळे शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण कमी होते आणि सांधेदुखी दूर होते.
* तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास त्वचेतील लुळेपणा दूर होतो. डेड स्किन निघून जाते आणि चेहरा नेहमी उजळ दिसतो.
* अॅसिडिटी, गॅस किंवा पोटाची दुसरी समस्या असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी अमृतासमान आहे. शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
* अॅनिमिया किंवा रक्ताची कमतरता ही एक अशी समस्या आहे, ज्यामुळे ३० वयापेक्षा जास्त वयाच्या अधिक भारतीय महिला त्रस्त आहेत. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
* रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी पिल्यास संपूर्ण शरीरात रक्ताचा संचार व्यवस्थित होतो. कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते आणि हृदयाचे विकार दूर राहतात.
* कॅन्सर असलेल्या रुग्णांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी अवश्य प्यावे. तांब्याच्या भांड्यातील पाणी वात, पित्त आणि कफ दूर करते.
* तांब्याच्य भांड्यातील पाणी पिल्यास शरीरातील घातक सूक्ष्मजीव नष्ट होतात. निर्जंतुकीकरणाची क्षमता असलेल्या घटकांत तांब या धातूचा समावेश आहे. यामुळे यरिया, अतिसार, कावीळचे किटाणू नष्ट होतात.
* वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच तांब्याच्या भांड्यातील प्यावे.