आरोग्यानामा ऑनलाइन टीम – आहाराचा परिणाम आपल्या मेंदूवर पडत असतो. काही आहार हे मेंदूला सक्रिय ठेवतात. तर काही आहारामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकतो. चूकीच्या आहारामुळे स्मरणशक्ती कमी होतेच, शिवाय मेंदूसंबंधीत काही आजार सुद्धा होऊ शकतात. मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी अशा आहारांपासून दूर राहणे, गरजेचे आहे.
कृत्रिम स्वीटनर
कृत्रिम स्वीटनरमध्ये टॉक्सिक असतात. जे मेंदूसाठी चांगले नसतात. यामुळे मस्तिष्कसंबंधी समस्या निर्माण होतात. यामुळे पौष्टीक स्वीटनरचा प्रयोग करा.
टोफू
टोफूचे (सोयाबीनचे पनीर) अधिक सेवन मेंदूच्या आरोग्यासाठी चांगले नसते. टोफूच्या सेवनाने मेंदू कमकुवत होतो. ६८ वयानंतर स्मरणशक्ती कमकुवत होण्याची समस्या जास्त निर्माण होते. हे डिमेंशियाच्या धोक्याला वाढवते.
शुगर
शुगर आणि शुगरयुक्त आहात मेंदूसाठी चांगले नाही. कँडी, केक, मिठाई यांमध्ये फ्रक्टोज असते. यामुळे वजन वाढते. तसेच मेंदू कमकुवत होतो. शुगरचे जास्त सेवन केल्याने तार्किक क्षमता आणि नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता कमी होते.
जास्त मीठ
मीठाचे जास्त सेवन करणे हे मेंदू आणि हृदयासाठी चांगले नसते. मीठामध्ये सोडियम असते जे बौध्दीक क्षमतेवर परिणाम करते. जास्त मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढते यामुळे अस्वस्थपणा वाढतो.
तळलेले पदार्थ
तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढते. तसेच मेंदू कमकुवत होतो. समोसे, कचोरी इत्यादी तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे मेंदूसाठी चांगले नसते. हे आहार तंत्रिका कोशिकांना हळुहळू नष्ट करते आणि मेंदूला कमकुवत करते.
जंक फूड
फास्टफूड आणि जंक फूड आजारांसोबतच मेंदूसाठीसुध्दा हानिकारक असतात. फास्टफूड आणि जंकफूड खाल्ल्याने मेंदूमध्ये उपलब्ध रसायनांची संरचना बदलते. याव्यतिरिक्त अस्वस्थता आणि गँगरीनचे लक्षण सुरु होतात. या आहारामुळे एकाग्रता वाढते. हार्मोन म्हणजेच डोपामाइनची निर्मिती कमी होते.
प्रोसेस्ड प्रोटीन
शरीरातील मासपेशींच्या विकासासाठी प्रोटीन खुप आवश्यक असते. परंतु, हॉटडग, सॉसेज इत्यादी पदार्थ खाण्यापासुन दूर राहा. कारण यामध्ये उपलब्ध प्रोटीन नव्र्हस सिस्टमसाठी हानिकारक असतात. प्रोटीनच्या पुर्ततेसाठी मांस, सालमन, डाळी, बदामाचे सेवन करणे फायदेशीर असते.
कॅफिन
नियमित तीन कप कॉफीचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. परंतु यापेक्षा जास्त कॉफी प्यायल्याने मेंदू प्रभावित होतो. शरीर कॅफिनला खुप लवकर अवशोषित करते आणि हे मेंदूला सक्रिय करते. परंतु जास्त प्रमाणात सेवन केले तर मेंदूला धोका पोहोचू शकते. यामुळे तार्किक क्षमता कमी होते आणि स्मरणशक्ती कमकुवत होते.