आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थकवा जाणवत असल्यास घरातच उपलब्ध असलेल्या काही पदार्थांनी शरीरात उत्साह निर्माण करता येतो. यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. काम करताना सुस्ती जाणवत असेल तर थोड्या-थोड्या अंतराने पाणी प्यावे. यामुळे उत्साह आणि उर्जा वाढेल. दिवसाची सुरुवातच दोन ग्लास पाणी पिऊन करावी, असे आयुर्वेदात सांगितले आहे. मात्र, रिकाम्या पोटी जास्त पाणी पिऊ नये.
हे आहेत सुपरफूड
नारळ पाणी
सुस्ती, थकवा किंवा आळस असल्यास नारळ पाणी घ्यावे. नारळातील काही तत्वांमुळे भरपूर उर्जा मिळते. शरीरातील उर्जेचा स्तर वाढतो. रिकाम्या पोटी शहाळ्यातील खोबरे खाल्ल्यास पोटातील जळजळ कमी होते.
आंबट फळे
सुस्ती दूर करण्यासाठी संत्री, द्राक्ष आणि लिंबू ही आंबट-गोड फळे खूप फायदेशीर ठरतात. हे फळ रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासोबतच शरीरात उर्जेचा स्तर वाढवतात.
अंकुरित ध्यान
अंकुरित ध्यान म्हणजेच मुग, मटकी, वाटाणे उर्जा वाढवणारे पदार्थ आहेत. या गोष्टींचे सेवन केल्यास सुस्ती येणार नाही आणि शरीरात उर्जेचा स्तर कायम राहील.
केळी
केळी खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. केळीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी असते. यामुळे शरीराला उर्जा मिळते.
अद्रकचा चहा
शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी अद्रकाचा चहा उपयोगी ठरतो. यामुळे शरीरात उत्साह निर्माण होतो. यामध्ये अँटीऑक्सिडेंट घटक असल्यामुळे शरीर उर्जवान राहते.
बदाम
बदामामध्ये पोषकत तत्व भरपूर प्रमाणात आढळून येतात. बदामामध्ये असलेले प्रोटीन आणि वसा तुम्हाला नेहमी उत्साही आणि उर्जवान ठेवतात.